शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

हे घ्या कर्जमाफीचे पुरावे, काँग्रेस नेत्यांनी गाठलं शिवराज सिंह चौहान यांचं घर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 14:20 IST

मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी भाजपाने काँग्रेसवर टीका केली. शेतकरी कर्जमाफी निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार काँग्रेसवर केला जात होता

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी भाजपानेकाँग्रेसवर टीका केली. शेतकरी कर्जमाफी निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार काँग्रेसवर केला जात होता. याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी अनोखी शक्कल लढवत थेट मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचे घर गाठले. 

माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिष्टमंडळाने कर्जमाफी केल्याचे पुरावे म्हणून दस्तावेज दिले. तब्बल एक गाडी भरुन हे दस्तावेज शिवराज चौहान यांच्या घरी आणून त्यांच्यासमोर ही सगळी कागदपत्रे ठेवण्यात आली. शिवराज चौहान यांना देण्यात आलेली सर्व कागदपत्रे हे शेतकरी कर्जमाफीचे पुरावे आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची नावे, त्यांचे मोबाईल नंबर, कर्जमाफीचं प्रमाणपत्र, कोणत्या बँकेचे कर्ज घेतले यासह संपूर्ण माहिती देण्यात आली असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. 

मध्य प्रदेशमध्ये शेतकरी कर्जमाफीवरुन भाजपाकडून काँग्रेसवर घेरण्याचे प्रयत्न सुरु होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याकडून कमलनाथ सरकारवर आरोप केले जात होते. भाजपाने शनिवारी काँग्रेस सरकारविरोधात आरोपपत्र प्रकाशित करत शेतकरी कर्जमाफीचा दावा खोटा असल्याचं सांगण्यात आलं. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली. 

यावेळी बोलताना सुरेश पचौरी यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफीचं प्रकरण कुठेही लपलेलं नाही. सर्व माहिती ऑनलाइन आहे. शिवराज चौहान आणि भाजपा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम करत आहे. खोट्या माहितीच्या आधारे आरोप केले जात आहेत त्यामुळेच आम्ही शेतकरी कर्जमाफीचे सर्व पुरावे त्यांना दिले आहेत. शिवराज चौहान सत्तेत असताना त्यांनी कर्जमाफीचा दावा केला होता मात्र तो दावा पोकळ सिद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 

शेतकऱ्यांना फसवून काही होणार नाहीमुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडून कृषी विभागाचे दस्तावेज मला पाठवण्यात आले. मला बँकेची यादी द्यावी कारण बँकांकडून कर्जमाफी केली जाणार आहे. फक्त वातावरण खराब करण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी असा प्रकार काँग्रेसकडून करण्यात आला. फक्त यादी बनविल्याने कर्जमाफी होत नाही. 48 हजार कोटींची कर्जमाफी देणार सांगितले अन् फक्त 1300 कोटी रुपये दिले तर कर्जमाफी कशी होणार? असा सवाल शिवराज चौहान यांनी काँग्रेसला केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान