ग्रामपंचायत कर्मचार्यांनी मांडल्या मुख्यमंत्र्यासमोर अडचणी
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:00+5:302015-03-20T22:40:00+5:30
नळेगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन आपल्या अडीअडचणी मांडल्या़ तसेच ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही विविध समस्यांचे निवेदन दिले़

ग्रामपंचायत कर्मचार्यांनी मांडल्या मुख्यमंत्र्यासमोर अडचणी
न ेगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन आपल्या अडीअडचणी मांडल्या़ तसेच ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही विविध समस्यांचे निवेदन दिले़यावेळी महासंघाचे कार्याध्यक्ष पंडित नागरगोजे, उपाध्यक्ष बालाजी सरतापे, हणमंत कांबळे, दयानंद त्रिमुखे, संभाजी फुलारी, जमील बागवान यांची उपस्थिती होती़ यावेळी या पदाधिकार्यांनी लोकसंख्येचा आकृतीबंद रद्द करा़ सर्व परीमंडळांना १० टक्के वेतन शासनाकडून देण्यात यावे़ ग्रामपंचायत कर्मचार्यांना राहणीमान भत्ता शासनाने द्यावा़ ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे़ पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्या मांडण्यात आल्या़ तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले़