शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

शेतकऱ्यांचे प्रश्न जगाला कळले, सरकारचे दुर्लक्ष; केरळमध्ये काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:03 AM

राहुल गांधी यांची टीका, केरळमध्ये काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली

वायनाड : भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या व्यथा संपूर्ण जगाच्या लक्षात आल्या आहेत. सारे जग शेतकरी आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत आहे. पण, केंद्रातील मोदी सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केली. 

काँग्रेसतर्फे केरळमध्ये काढण्यात आलेल्या सहा किलोमीटरच्या ट्रॅक्टर रॅलीत राहुल गांधी सहभागी झाले  होते. त्यानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले की, भारतात शेती हा सर्वांत मोठा म्हणजे तब्बल ४० लाख कोटी रुपयांचा व्यवसाय आहे.  शेतकऱ्यांच्या जिवावरच हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. पण, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. हा सारा व्यवसाय आपल्या दोन मित्रांच्या हाती सोपविण्यासाठीच तिन्ही कृषी कायदे करण्यात आले आहेत. 

हे काळे कायदे रद्द व्हावेत, यासाठी जनतेने मोदी सरकारवर दबाव आणायला हवा, असे आवाहन करून राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जगाला समजल्या, कलाकारांना लक्षात आल्या. पण, सरकार त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. कारण त्यांना शेतकऱ्यांचे नव्हे, तर आपल्या काही मित्रांचेच भले करण्याची इच्छा आहे. (वृत्तसंस्था)

शेतकरी जगायलाच हवा

मोदी सरकार सतत भारतमातेच्या नावाचा जयघोष करते. तो सर्वांनीच करायला हवा. पण, या भारतमातेसाठी शेती हाच एकमेव सर्वांत मोठा व्यवसाय असून, तो टिकायला हवा, शेतकरी जगायला हवा. पण पंतप्रधान मोदी यांच्या सरकारचे सारे निर्णय मात्र शेती व शेतकरी यांच्या विरोधातील आहेत. - राहुल गांधी

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी