शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'लोकसभा निवडणुकांत समाजमाध्यमांमुळे ४ ते ५% मते फिरण्याची शक्यता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:42 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये ४ ते ५ टक्के मते अन्यत्र वळण्याची शक्यता असल्याने कमी मताधिक्याने निवडून येणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा घटक ठरणार आहे असे माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकार टी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले.

हैदराबाद : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४ ते ५ टक्के मते अन्यत्र वळण्याची शक्यता असल्याने कमी मताधिक्याने निवडून येणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा घटक ठरणार आहे असे माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकार टी. व्ही. मोहनदास पै यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, युवक विशेषत: जे या निवडणुकांत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत ते समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. त्यातून त्यांना एखादा पक्ष किंवा उमेदवार यांच्याविषयी प्राथमिक माहिती मिळते. पै हे इन्फोसिस या कंपनीचे माजी मुख्य वित्त अधिकारी आहेत. ते म्हणाले की, समाजमाध्यमांतून मिळणाऱ्या माहितीद्वारे आपले विचार पक्के करून युवा मतदारांपैकी ४० ते ५० टक्के लोक त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतील. सध्याचे युवक हे टीव्ही न पाहाता व्हिडीओ पाहातात. त्यासाठी ते यू ट्युब, समाजमाध्यमांचा वापर करतात. ते वृत्तपत्र वाचत नाहीत. समाजमाध्यमांवर जे दिसते त्याने युवक प्रभावित होतात. त्यांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध मार्ग शोधले पाहिजेत. हे युवक कोणत्या गोष्टींतून प्रेरणा घेतात, त्यांना नेमके काय भावते, कोणत्या ठिकाणी जास्त जायला आवडते, ते आपल्या भविष्याबद्दल काय विचार करतात अशा अनेक गोष्टींचा मागोवा राजकीय पक्षांनी घ्यायला हवा.त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना राजकीय पक्षांनी संदेश पाठविले पाहिजेत. युवकांतील विशिष्ट गटांना डोळ््यांसमोर ठेवून संदेशांची रचना केली पाहिजे. ते संदेश उज्ज्वल भविष्याविषयी सकारात्मक भाष्य करणारे असावेत.राहुल गांधींच्या तोंडी १९९०च्या दशकातील भाषाटी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर भारताला कशी वागणूक मिळते याविषयी युवकांना जाणून घेण्याची प्रचंड इच्छा असते. त्यांना परदेशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करायचा असतो. जगामध्ये भारताचे स्थान उंचावण्यासाठी सरकारने केलेल्या यशस्वी प्रयत्नांच्या कहाण्या जर संदेशरुपात राजकीय पक्षांनी युवकांना पाठविल्या तर ते युवकांना नक्कीच आवडेल. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात भाजप सर्व राजकीय पक्षांमध्ये आघाडीवर आहे. १९९०च्या दशकात वापरली जाणारी भाषा राहुल गांधी यांच्या तोंडी असल्याने ते युवकांमध्ये फारसे लोकप्रिय नाहीत असेही पै म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSocial Mediaसोशल मीडियाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी