शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

'लोकसभा निवडणुकांत समाजमाध्यमांमुळे ४ ते ५% मते फिरण्याची शक्यता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:42 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये ४ ते ५ टक्के मते अन्यत्र वळण्याची शक्यता असल्याने कमी मताधिक्याने निवडून येणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा घटक ठरणार आहे असे माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकार टी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले.

हैदराबाद : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४ ते ५ टक्के मते अन्यत्र वळण्याची शक्यता असल्याने कमी मताधिक्याने निवडून येणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा घटक ठरणार आहे असे माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकार टी. व्ही. मोहनदास पै यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, युवक विशेषत: जे या निवडणुकांत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत ते समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. त्यातून त्यांना एखादा पक्ष किंवा उमेदवार यांच्याविषयी प्राथमिक माहिती मिळते. पै हे इन्फोसिस या कंपनीचे माजी मुख्य वित्त अधिकारी आहेत. ते म्हणाले की, समाजमाध्यमांतून मिळणाऱ्या माहितीद्वारे आपले विचार पक्के करून युवा मतदारांपैकी ४० ते ५० टक्के लोक त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतील. सध्याचे युवक हे टीव्ही न पाहाता व्हिडीओ पाहातात. त्यासाठी ते यू ट्युब, समाजमाध्यमांचा वापर करतात. ते वृत्तपत्र वाचत नाहीत. समाजमाध्यमांवर जे दिसते त्याने युवक प्रभावित होतात. त्यांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध मार्ग शोधले पाहिजेत. हे युवक कोणत्या गोष्टींतून प्रेरणा घेतात, त्यांना नेमके काय भावते, कोणत्या ठिकाणी जास्त जायला आवडते, ते आपल्या भविष्याबद्दल काय विचार करतात अशा अनेक गोष्टींचा मागोवा राजकीय पक्षांनी घ्यायला हवा.त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना राजकीय पक्षांनी संदेश पाठविले पाहिजेत. युवकांतील विशिष्ट गटांना डोळ््यांसमोर ठेवून संदेशांची रचना केली पाहिजे. ते संदेश उज्ज्वल भविष्याविषयी सकारात्मक भाष्य करणारे असावेत.राहुल गांधींच्या तोंडी १९९०च्या दशकातील भाषाटी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर भारताला कशी वागणूक मिळते याविषयी युवकांना जाणून घेण्याची प्रचंड इच्छा असते. त्यांना परदेशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करायचा असतो. जगामध्ये भारताचे स्थान उंचावण्यासाठी सरकारने केलेल्या यशस्वी प्रयत्नांच्या कहाण्या जर संदेशरुपात राजकीय पक्षांनी युवकांना पाठविल्या तर ते युवकांना नक्कीच आवडेल. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात भाजप सर्व राजकीय पक्षांमध्ये आघाडीवर आहे. १९९०च्या दशकात वापरली जाणारी भाषा राहुल गांधी यांच्या तोंडी असल्याने ते युवकांमध्ये फारसे लोकप्रिय नाहीत असेही पै म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSocial Mediaसोशल मीडियाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी