शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

"ड्रायव्हर्स हे आपल्या अर्थव्यवस्थेची आणि प्रगतीची चाकं, ते अत्यंत कमी वेतनावर खडतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:37 IST

Priyanka Gandhi : केंद्र सरकार जनतेला त्रास देणारे कायदे करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या नवीन हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रकचालकांच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा पाठिंबा मिळाला आहे. याच दरम्यान त्यांनी यावरून केंद्रावरही जोरदार निशाणा साधला आहे. बुधवारी (3 जानेवारी) त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत ट्विट केलं आहे. तसेच केंद्राला ड्रायव्हर्सच्या सुविधांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

प्रियंका गांधी यांनी मंगळवारीही अशीच पोस्ट करत ट्रक चालकांच्या संपाबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. केंद्र सरकार जनतेला त्रास देणारे कायदे करत असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. "ड्रायव्हर्स हे आपल्या अर्थव्यवस्थेची आणि प्रगतीची चाकं आहेत. ते अत्यंत कमी वेतनावर खडतर जीवनशैली जगतात, विविध अडचणींना तोंड देतात. कायदा आणि व्यवस्था त्यांच्याप्रती मानवीय असली पाहिजे."

"प्रत्येक जीव अनमोल आहे. प्रत्येकाचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कायद्याचा उद्देश सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य, सुरक्षित आणि न्याय मिळवून देणे आणि लाखो लोकांना यातना न देणे हा आहे. सल्लामसलत न करता आणि विरोधकांना सहभागी न करता एकतर्फी तुघलकी कायदे बनवण्याचे काम थांबवले पाहिजे" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

केंद्र सरकारने 'हिट अँड रन' (Hit And Run) कायद्यात केलेल्या (Motor Vehicles Act) बदलांविरोधात देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारला होता. या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील लोकांचे हाल झाले. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासमवेत गृह मंत्रालयात राष्ट्रीय परिवहन संघटनेची बैठक झाली. यावेळी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस