शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : "250 हून अधिक घोटाळे, मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत?"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 15:29 IST

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार तुम्हाला कमकुवत करत आहे. मध्यप्रदेशात 250 हून अधिक घोटाळे झाले आहेत.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी 5 ऑक्टोबरला मध्य प्रदेशातील धार येथील मोहनखेडा येथे पोहोचल्या. मध्य प्रदेश ही महापुरुषांची भूमी आहे असं म्हणत त्यांनी जाहीर सभेत आपली आजी इंदिरा गांधी यांची आठवण काढली. "आजी आम्हाला तुमच्या समाजाच्या, आदिवासी समाजाच्या गोष्टी सांगायची. इंदिरा गांधींना तुमच्या संस्कृतीबद्दल आदर होता" असं म्हटलं आहे. तसेच भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार तुम्हाला कमकुवत करत आहे. मध्यप्रदेशात 250 हून अधिक घोटाळे झाले आहेत. गेल्या 18 वर्षात राज्यात फक्त घोटाळा आणि भ्रष्टाचार झाला आहे. व्यापम घोटाळ्यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याची कोणी चौकशी केली का? यासोबतच प्रियंका गांधींनी ईडीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. 

"देशातील तरुणाई हे वादळ आहे. तुमच्यासोबत जे काही होत आहे ते चुकीचे आहे. तुम्ही रोज संघर्ष करून जीवन जगत आहात. आम्ही असेही काही तरुण पाहिले ज्यांना दहा वर्षे उलटून गेल्यावर देखील घोटाळ्यामुळे नोकरी मिळालेली नाही. सरकारकडे पेन्शन देण्यासाठी पैसे नाहीत आणि अदानींचे हजारो कोटी रुपये माफ करण्यासाठी पैसे आहेत" असा खोचक टोला प्रियंका गांधींनी लगावला आहे. 

प्रियंका म्हणाल्या की, "काही लोकांनी नेत्यांना देव बनवले आहे. मध्य प्रदेशात महागाई शिगेला पोहोचली आहे. मोफत रेशन देणे हे उपकार नाहीत. सरकार शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी नुकसान भरपाई देईल, निवडणुकीनंतर नाही. इंदूर विभागात गेल्या 18 वर्षांत एकही विद्यापीठ किंवा नवीन रुग्णालय बांधलेले नाही. महिलांच्या मतांशिवाय कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही. तुमच्याशी राजकीय खेळ खेळला जात आहे."

प्रियंका यांनी काँग्रेसच्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला. राज्यातील रहिवाशांना 100 रुपये प्रति युनिट दराने वीज मोफत मिळणार आहे. गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार आहे. महिलांना दरमहा 1500 रुपये देणार. शेतकऱ्यांना 5 हॉर्स पावर वीज मोफत मिळणार आहे. जुनी पेन्शन लागू होईल. हा देश तुमचा आहे, राज्य तुमचे आहे. जबाबदारीही तुमची आहे. राज्यघटनेने तुम्हाला अधिकार दिले आहेत. तुमच्या भविष्यासाठी मतदान करा. हे खूप मोलाचे आहे. त्यामुळे काँग्रेसला मतदान करा असं देखील म्हटलं आहे.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण