शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

Priyanka Gandhi : "250 हून अधिक घोटाळे, मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत?"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 15:29 IST

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार तुम्हाला कमकुवत करत आहे. मध्यप्रदेशात 250 हून अधिक घोटाळे झाले आहेत.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी 5 ऑक्टोबरला मध्य प्रदेशातील धार येथील मोहनखेडा येथे पोहोचल्या. मध्य प्रदेश ही महापुरुषांची भूमी आहे असं म्हणत त्यांनी जाहीर सभेत आपली आजी इंदिरा गांधी यांची आठवण काढली. "आजी आम्हाला तुमच्या समाजाच्या, आदिवासी समाजाच्या गोष्टी सांगायची. इंदिरा गांधींना तुमच्या संस्कृतीबद्दल आदर होता" असं म्हटलं आहे. तसेच भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार तुम्हाला कमकुवत करत आहे. मध्यप्रदेशात 250 हून अधिक घोटाळे झाले आहेत. गेल्या 18 वर्षात राज्यात फक्त घोटाळा आणि भ्रष्टाचार झाला आहे. व्यापम घोटाळ्यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याची कोणी चौकशी केली का? यासोबतच प्रियंका गांधींनी ईडीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. 

"देशातील तरुणाई हे वादळ आहे. तुमच्यासोबत जे काही होत आहे ते चुकीचे आहे. तुम्ही रोज संघर्ष करून जीवन जगत आहात. आम्ही असेही काही तरुण पाहिले ज्यांना दहा वर्षे उलटून गेल्यावर देखील घोटाळ्यामुळे नोकरी मिळालेली नाही. सरकारकडे पेन्शन देण्यासाठी पैसे नाहीत आणि अदानींचे हजारो कोटी रुपये माफ करण्यासाठी पैसे आहेत" असा खोचक टोला प्रियंका गांधींनी लगावला आहे. 

प्रियंका म्हणाल्या की, "काही लोकांनी नेत्यांना देव बनवले आहे. मध्य प्रदेशात महागाई शिगेला पोहोचली आहे. मोफत रेशन देणे हे उपकार नाहीत. सरकार शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी नुकसान भरपाई देईल, निवडणुकीनंतर नाही. इंदूर विभागात गेल्या 18 वर्षांत एकही विद्यापीठ किंवा नवीन रुग्णालय बांधलेले नाही. महिलांच्या मतांशिवाय कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही. तुमच्याशी राजकीय खेळ खेळला जात आहे."

प्रियंका यांनी काँग्रेसच्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला. राज्यातील रहिवाशांना 100 रुपये प्रति युनिट दराने वीज मोफत मिळणार आहे. गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार आहे. महिलांना दरमहा 1500 रुपये देणार. शेतकऱ्यांना 5 हॉर्स पावर वीज मोफत मिळणार आहे. जुनी पेन्शन लागू होईल. हा देश तुमचा आहे, राज्य तुमचे आहे. जबाबदारीही तुमची आहे. राज्यघटनेने तुम्हाला अधिकार दिले आहेत. तुमच्या भविष्यासाठी मतदान करा. हे खूप मोलाचे आहे. त्यामुळे काँग्रेसला मतदान करा असं देखील म्हटलं आहे.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण