शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

UP Election 2022: “मी मरेन पण कधीही BJP सोबत जाणार नाही”; योगींच्या गोरखपूरमध्ये प्रियंका गांधी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 18:44 IST

UP Election 2022: काँग्रेसने रेल्वे, विमानतळे, रस्ते तयार केले. ते सर्व यांनी विकून टाकले, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

गोरखपूर:उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वच पक्ष आता आक्रमक होताना दिसत असून, नेते मंडळींचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षातील प्रवेशाला सुरुवात झाली आहे. यातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या दंड थोपटून मैदानात उतरल्या असून, योगी आदित्यनाथांचा गड मानल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये प्रतिज्ञा रॅलीला संबोधित केले. यावेळी बोलताना मृत्यू आला तरी भाजपसोबत जाणार नाही, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 

या सभेत प्रियांका गांधी यांनी भाजपसह सप आणि बसपवर जोरदार निशाणा साधला. प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुरू गोरखनाथांच्या विचाराच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला. ते आरोप करतात की काँग्रेस भाजपला सोबत मिळून काम करतेय. मात्र आपण त्यांना सांगू इच्छितो की, मृत्यू आला तरी भाजपसोबत जाणार नाही, असा पलटवार सप आणि बसपवर केला आहे. 

दुर्बिण सोडा आणि चष्मा घाला

प्रियंका गांधी यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खोचक टीका केली. अमित शाह यांचे वक्तव्य ऐकत होते. उत्तर प्रदेशात गुन्हेगार शोधायचे असतील तर दुर्बिणीची गरज आहे, असे ते सांगत होते. त्यावेळी ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले ते अजय मिश्रा त्यांच्या बाजूला बसलेले होते. मला त्यांना सांगायचे आहे की दुर्बिण सोडा आणि चष्मा घाला, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 

७० वर्षांची मेहनत ७ वर्षांत वाया घालवली

काँग्रेसने रेल्वे, विमानतळे, रस्ते तयार केले. ते सर्व यांनी विकून टाकले, आणि विचारतात की, आम्ही ७० वर्षांत काय केले. ७० वर्षांच्या प्रयत्नांना यांनी फक्त ७ वर्षांत वाया घालवले, अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यावेळी केली. उत्तर प्रदेशमध्ये ५ कोटी युवक बेरोजगार असून, अनेकजण रोज आत्महत्या करत असल्याचा दावा प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकBJPभाजपा