शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Rahul Gandhi : 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 13:25 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर पक्षाने दिल्लीतील राजघाटवर 'संकल्प सत्याग्रह' केला, ज्यात पक्षाचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज काँग्रेसने दिल्लीतील राजघाटवर 'संकल्प सत्याग्रह' केला, ज्यात पक्षाचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत 'या देशाचा पंतप्रधान भित्रा आहे, लाज बाळगा, माझ्यावर केस टाका.. पण वास्तव हे आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत,' अशी घणाघाती टीका केली.

'राहुलला पप्पू म्हणतात...'राहुल गांधींचा उल्लेख करत प्रियंका गांधी म्हणाल्या, 'हा माणूस देशातील जनतेचा आवाज उठवत आहे. तो म्हणतोय गरीब, तरुण आणि महिलांना त्यांचा हक्क द्या. तुमचा अधिकार तुमच्याकडे गेला पाहिजे. हे राहुल गांधींबद्दल नाही, तर संपूर्ण देशाबद्दल आहे. राहुल गांधी यांनी जगातील दोन मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे हार्वर्ड आणि केंब्रिजमधून पदवी आहेत.'

'राहुल गांधींनी क्रेंब्रिजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी(एमफिल पदवी) मिळवली आहे आणि तुम्ही त्यांना पप्पू बनवता...तुम्ही पदवी पाहिली नाही, सत्य पाहिले नाही आणि त्याला पप्पू बनवले. मग हा पप्पू प्रवासाला निघाला आणि तेव्हा यांना कळलं की, हा पप्पू नाही. त्याच्यासोबत लाखो लोक फिरत आहेत. तो प्रामाणिक आहे, त्याला सर्व गोष्टी समजतात, तो लोकांमध्ये जातो. आज जनता त्याच्यासोबत आहे. संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

अहंकारी राजा...प्रियंका पुढे म्हणाल्या, 'जेव्हा गर्विष्ठ हुकूमशहा उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा ते पूर्ण शक्तीने जनतेला दाबण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे सरकार एका माणसाला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न का करत आहे? या अदानीमध्ये नेमकं काय आहे, ज्यामुळे तुम्ही देशाची सर्व संपत्ती देत आहात. कोण आहे हा अदानी, ज्याचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसतोय. अहंकारी राजाला जनताच उत्तर देणार. आज हा देश मनातून बोलतोय, सत्य ओळखतोय. आज तो दिवस आहे, आजपासून सर्वकाही बदलण्यास सुरुवात होईल,' असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा