शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

Rahul Gandhi : 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 13:25 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर पक्षाने दिल्लीतील राजघाटवर 'संकल्प सत्याग्रह' केला, ज्यात पक्षाचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज काँग्रेसने दिल्लीतील राजघाटवर 'संकल्प सत्याग्रह' केला, ज्यात पक्षाचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत 'या देशाचा पंतप्रधान भित्रा आहे, लाज बाळगा, माझ्यावर केस टाका.. पण वास्तव हे आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत,' अशी घणाघाती टीका केली.

'राहुलला पप्पू म्हणतात...'राहुल गांधींचा उल्लेख करत प्रियंका गांधी म्हणाल्या, 'हा माणूस देशातील जनतेचा आवाज उठवत आहे. तो म्हणतोय गरीब, तरुण आणि महिलांना त्यांचा हक्क द्या. तुमचा अधिकार तुमच्याकडे गेला पाहिजे. हे राहुल गांधींबद्दल नाही, तर संपूर्ण देशाबद्दल आहे. राहुल गांधी यांनी जगातील दोन मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे हार्वर्ड आणि केंब्रिजमधून पदवी आहेत.'

'राहुल गांधींनी क्रेंब्रिजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी(एमफिल पदवी) मिळवली आहे आणि तुम्ही त्यांना पप्पू बनवता...तुम्ही पदवी पाहिली नाही, सत्य पाहिले नाही आणि त्याला पप्पू बनवले. मग हा पप्पू प्रवासाला निघाला आणि तेव्हा यांना कळलं की, हा पप्पू नाही. त्याच्यासोबत लाखो लोक फिरत आहेत. तो प्रामाणिक आहे, त्याला सर्व गोष्टी समजतात, तो लोकांमध्ये जातो. आज जनता त्याच्यासोबत आहे. संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

अहंकारी राजा...प्रियंका पुढे म्हणाल्या, 'जेव्हा गर्विष्ठ हुकूमशहा उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा ते पूर्ण शक्तीने जनतेला दाबण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे सरकार एका माणसाला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न का करत आहे? या अदानीमध्ये नेमकं काय आहे, ज्यामुळे तुम्ही देशाची सर्व संपत्ती देत आहात. कोण आहे हा अदानी, ज्याचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसतोय. अहंकारी राजाला जनताच उत्तर देणार. आज हा देश मनातून बोलतोय, सत्य ओळखतोय. आज तो दिवस आहे, आजपासून सर्वकाही बदलण्यास सुरुवात होईल,' असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा