शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Rahul Gandhi : 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 13:25 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर पक्षाने दिल्लीतील राजघाटवर 'संकल्प सत्याग्रह' केला, ज्यात पक्षाचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज काँग्रेसने दिल्लीतील राजघाटवर 'संकल्प सत्याग्रह' केला, ज्यात पक्षाचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत 'या देशाचा पंतप्रधान भित्रा आहे, लाज बाळगा, माझ्यावर केस टाका.. पण वास्तव हे आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत,' अशी घणाघाती टीका केली.

'राहुलला पप्पू म्हणतात...'राहुल गांधींचा उल्लेख करत प्रियंका गांधी म्हणाल्या, 'हा माणूस देशातील जनतेचा आवाज उठवत आहे. तो म्हणतोय गरीब, तरुण आणि महिलांना त्यांचा हक्क द्या. तुमचा अधिकार तुमच्याकडे गेला पाहिजे. हे राहुल गांधींबद्दल नाही, तर संपूर्ण देशाबद्दल आहे. राहुल गांधी यांनी जगातील दोन मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे हार्वर्ड आणि केंब्रिजमधून पदवी आहेत.'

'राहुल गांधींनी क्रेंब्रिजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी(एमफिल पदवी) मिळवली आहे आणि तुम्ही त्यांना पप्पू बनवता...तुम्ही पदवी पाहिली नाही, सत्य पाहिले नाही आणि त्याला पप्पू बनवले. मग हा पप्पू प्रवासाला निघाला आणि तेव्हा यांना कळलं की, हा पप्पू नाही. त्याच्यासोबत लाखो लोक फिरत आहेत. तो प्रामाणिक आहे, त्याला सर्व गोष्टी समजतात, तो लोकांमध्ये जातो. आज जनता त्याच्यासोबत आहे. संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

अहंकारी राजा...प्रियंका पुढे म्हणाल्या, 'जेव्हा गर्विष्ठ हुकूमशहा उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा ते पूर्ण शक्तीने जनतेला दाबण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे सरकार एका माणसाला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न का करत आहे? या अदानीमध्ये नेमकं काय आहे, ज्यामुळे तुम्ही देशाची सर्व संपत्ती देत आहात. कोण आहे हा अदानी, ज्याचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसतोय. अहंकारी राजाला जनताच उत्तर देणार. आज हा देश मनातून बोलतोय, सत्य ओळखतोय. आज तो दिवस आहे, आजपासून सर्वकाही बदलण्यास सुरुवात होईल,' असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा