शहरं
Join us  
Trending Stories
1
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
2
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
3
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
5
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
6
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
7
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
8
स्मिता पाटील यांच्यासोबतच्या तुलनेवर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया, म्हणाली, "बाईला संघर्ष आजही..."
9
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
10
मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही राधिका आपटे? म्हणाली, "मला काही काळापासून..."
11
मुलाने कपाटातून आईचा महागडा नेकलेस चोरला, तोडून शाळेतील विद्यार्थिनींना वाटला, त्यानंतर...
12
IND vs SA T20I : संजूच्या जागी गिल का? सलामी संदर्भात कॅप्टन सूर्यानं स्पष्टीकरण दिलं, पण...
13
Jara Hatke: रात्री झोपताना एक पाय ब्लँकेटमधून बाहेर काढण्याची सवय आहे? मग 'हे' वाचाच!
14
IND vs SA: विराटची शतकं, रोहितची फटकेबाजी, संघाने मालिकाही जिंकली; पण आता आली वाईट बातमी
15
बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण
16
चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
17
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
18
"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव
19
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
20
हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:23 IST

'वंदे मातरमवरील चर्चेतून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. '

Priyanka Gandhi in LokSabha: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्' गीतावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, वंदे मातरम् देशाच्या कणाकणात आहे. मग या विषयावर चर्चा करण्याची गरजच काय होती? ही चर्चा आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्याचा आरोपही त्यांनी केला.

इतक्या वर्षांनंतर वंदे मातरमवर चर्चा का?

प्रियंका गांधी म्हणाल्या की, वंदे मातरम् हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान आणि वेदनेची आठवण करून देणारे गीत आहे. वंदे मातरमचा उच्चार केला की स्वातंत्र्य लढ्याचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर येतो. वंदे मातरम 150 वर्षांपासून आपल्या देशाचा भाग आहे. मग आज या चर्चेची गरज काय आहे? यामागे सरकारचा हेतू काय आहे?

बंगालच्या निवडणुकांसाठी राजकीय खेळी?

सरकारवर आरोप करत प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, या चर्चेमागे दोन कारणे आहेत. पहिले- पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि दुसरे- इतिहासात ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्यावर नवे आरोप लादण्याचा प्रयत्न. हे सरकार भविष्याकडे पाहत नाही. लोकांच्या खरी समस्यांपासून लक्ष विचलित करणे हाच त्यांचा उद्देश असतो.

आजचे पंतप्रधान आधीसारखे राहिले नाहीत

मोदीजी उत्तम भाषण करतात, पण तथ्यांच्या बाबतीत कमकुवत पडतात. आजचे पंतप्रधान पूर्वीसारखे दिसत नाहीत. त्यांच्या धोरणांमुळे देश कमकुवत होत आहे. देशातील जनता महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षेच्या प्रश्नांनी त्रस्त आहे, पण सरकार यावर चर्चा करत नाही. आज देशातील लोक खुश नाहीत. बेरोजगारी, महागाई, गुन्हे, प्रदूषण यावर चर्चा नाही; पण वंदे मातरमवर चर्चा चालू आहे.

नेहरुंच्या भूमिकेची आठवण

प्रियंका गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या योगदानाचा उल्लेख करत सरकारवर टोला लगावला. त्या म्हणाल्या, जर नेहरुंनी इस्रो उभारले नसते, तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का? यावेळी प्रियंकांनी आव्हान दिले की, सरकारने एकदा नेहरुंवर चर्चा करायला हवी. वंदे मातरमवरील चर्चेतून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, प्रदूषण या गंभीर मुद्द्यांवर चर्चा न करता सरकार छोटीशी चर्चा करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Gandhi Questions Vande Mataram Debate, Criticizes Government's Motives.

Web Summary : Priyanka Gandhi questioned the need for a Vande Mataram debate, accusing the government of diverting attention from real issues like unemployment and inflation ahead of West Bengal elections. She also invoked Nehru's contributions.
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी