शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:23 IST

'वंदे मातरमवरील चर्चेतून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. '

Priyanka Gandhi in LokSabha: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्' गीतावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, वंदे मातरम् देशाच्या कणाकणात आहे. मग या विषयावर चर्चा करण्याची गरजच काय होती? ही चर्चा आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्याचा आरोपही त्यांनी केला.

इतक्या वर्षांनंतर वंदे मातरमवर चर्चा का?

प्रियंका गांधी म्हणाल्या की, वंदे मातरम् हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान आणि वेदनेची आठवण करून देणारे गीत आहे. वंदे मातरमचा उच्चार केला की स्वातंत्र्य लढ्याचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर येतो. वंदे मातरम 150 वर्षांपासून आपल्या देशाचा भाग आहे. मग आज या चर्चेची गरज काय आहे? यामागे सरकारचा हेतू काय आहे?

बंगालच्या निवडणुकांसाठी राजकीय खेळी?

सरकारवर आरोप करत प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, या चर्चेमागे दोन कारणे आहेत. पहिले- पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि दुसरे- इतिहासात ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्यावर नवे आरोप लादण्याचा प्रयत्न. हे सरकार भविष्याकडे पाहत नाही. लोकांच्या खरी समस्यांपासून लक्ष विचलित करणे हाच त्यांचा उद्देश असतो.

आजचे पंतप्रधान आधीसारखे राहिले नाहीत

मोदीजी उत्तम भाषण करतात, पण तथ्यांच्या बाबतीत कमकुवत पडतात. आजचे पंतप्रधान पूर्वीसारखे दिसत नाहीत. त्यांच्या धोरणांमुळे देश कमकुवत होत आहे. देशातील जनता महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षेच्या प्रश्नांनी त्रस्त आहे, पण सरकार यावर चर्चा करत नाही. आज देशातील लोक खुश नाहीत. बेरोजगारी, महागाई, गुन्हे, प्रदूषण यावर चर्चा नाही; पण वंदे मातरमवर चर्चा चालू आहे.

नेहरुंच्या भूमिकेची आठवण

प्रियंका गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या योगदानाचा उल्लेख करत सरकारवर टोला लगावला. त्या म्हणाल्या, जर नेहरुंनी इस्रो उभारले नसते, तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का? यावेळी प्रियंकांनी आव्हान दिले की, सरकारने एकदा नेहरुंवर चर्चा करायला हवी. वंदे मातरमवरील चर्चेतून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, प्रदूषण या गंभीर मुद्द्यांवर चर्चा न करता सरकार छोटीशी चर्चा करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Gandhi Questions Vande Mataram Debate, Criticizes Government's Motives.

Web Summary : Priyanka Gandhi questioned the need for a Vande Mataram debate, accusing the government of diverting attention from real issues like unemployment and inflation ahead of West Bengal elections. She also invoked Nehru's contributions.
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी