शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

प्रियांका मैदानात अन् काँग्रेस-सपा आले एकत्र; काँग्रेस लोकसभेच्या १७ जागांवर उमेदवार उभे करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 06:42 IST

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल, सपचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र चौधरी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी ही घोषणा केली.

आदेश रावल

लखनौ : समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील उत्तर प्रदेशमधील जागावाटपाचा अडथळा आता दूर झाला आहे. दोन्ही पक्षांनी बुधवारी राज्यात इंडिया आघाडीअंतर्गत जागावाटपाची औपचारिक घोषणा केली. या अंतर्गत राज्यातील ८० जागांपैकी काँग्रेस रायबरेली आणि अमेठीसह १७ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल, सपचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र चौधरी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी ही घोषणा केली. पांडे म्हणाले की, काँग्रेस १७ , तर राज्यातील उर्वरित ६३ जागांवर सप आणि इतर सहकारी पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवतील. सपाने मध्य प्रदेशातील खजुराहो लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही मागणी काँग्रेसने मान्य केली आहे.

दिल्लीत मतभेद

दिल्लीतील सातपैकी चार जागांची मागणी करणाऱ्या काँग्रेसला ‘आप’शी आघाडीच करायची नसल्याचा आरोप आप करीत आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक केजरीवाल यांची आतापर्यंत काँग्रेसश्रेष्ठींशी जागावाटपावरून दोनदा चर्चा झाली असून, ती मार्गी लागणार असल्याचे वाटत असताना पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत.

काँग्रेस कुठून लढणार?

राबबरेली, अमेठी, कानपूर, फतेहपूर सिक्री, बासगाव, सहारनपूर, प्रयागराज, बनारस, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी, देवरिया, महाराजगंज.

कुणी बजावली महत्त्वाची भूमिका?

प्रियांका गांधी मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर बोलून १७ जागांवर शिक्कामोर्तब केले. तर, उर्वरित दोन जागा बदलण्यास सांगितले. १९ रोजी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांची यादी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवली होती. त्यानंतर खरगे यांनी अखिलेश यांना सांगितले होते की, राहुल गांधी यांना मुरादाबाद आणि बिजनौर या दोन जागा हव्या आहेत. त्यानंतर अखिलेश यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखिलेश यांनी भारत जोडो न्याय यात्रेतही सहभाग घेतला नाही. अखेर प्रियांका गांधी यांनी अखिलेश यांच्याशी बोलून या आघाडीवर शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस