शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
4
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
5
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
6
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
7
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
8
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
9
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
10
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
11
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
12
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
13
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
14
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
15
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
16
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
17
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
18
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
19
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
20
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"हे निकाल आले नसते तर..."; लोकसभेत प्रियंका गांधी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, PM मोदींवरही थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:36 IST

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जबरदस्त निशाणा साधला आहे. "लोकसभा निवडणुकीचे निकाल असे आले नसते, ...

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जबरदस्त निशाणा साधला आहे. "लोकसभा निवडणुकीचे निकाल असे आले नसते, तर हे लोक संविधान बदलायलाही तयार होते," असे प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटले आहे. वायनाडमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेतील हे त्यांचे पहिलेच भाषण होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही थेट टीका केली. "आजच्या राजाला वेष बदलणे तर माहीत आहे, मात्र जनतेत जाण्याची आणि टीका ऐकण्याची हिम्मत नाही," असे प्रियांका म्हणाल्या.

प्रियांका म्हणाल्या, आम्ही संविधानाची ज्योज जळताना बघितली आहे आणि हे एक सुरक्षा कवच असल्याचेही समजले आहे. एक असे सुरक्षा कवच, जे देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कवच आहे. मात्र, दुःखाची गोष्ट म्हणजे,  आपले सत्ताधारी पक्षातील सहकारी, जे मोठ मोठ्या गप्पा मारतात, त्यांनी गेल्या 10 वर्षांत हे सुरक्षा कवच तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. संविधानात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे वचन आहे. हे सुरक्षा कवच तोडण्याचे काम सुरू झाले आहे. लॅटरल एन्ट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमाने हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे.

प्रियांका पुढे म्हणाल्या, जर लोकसभा निवडणुकीत हे निकाल आले नसते तर, यांनी संविधान बदलायलाही सुरुवात केली असती. खरे तर, हे वारंवार संविधान-संविधान करत आहेत, कारण यांना, देशातील जनता संविधान बदू देणार नाही, हे माहीत झाले आहे. यांना पराभूत होता होता हे लक्षात आले आहे.

पंतप्रधान मोदींवर निशाणा - पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना प्रियांका म्हणाल्या, "पंतप्रधान संविधान कपाळावर लावतात, पण जेव्हा न्यायासाठी आवाज येतो, तेव्हा त्यांच्या कपाळावर सुरकुतीही नसते. भारतीय राज्यघटना हे संघाचे विधान नाही. हे त्यांना समजलेले नाही. करोडो देशवासीयांच्या हृदयात एकमेकांबद्दल प्रेम आहे, द्वेष नाही. यांच्या फुटीरतावादी धोरणांचे परिणाम आपण रोज पाहतो. राजकीय फायद्यासाठी संविधान तर सोडाच, पण देशाची एकात्मताही पणाला लावतील. संभलमध्ये पाहिले, मणिपूरमध्ये पाहिले. ते म्हणतात की देशाचे वेगवेगळे भाग आहेत. पण आपले संविधान सांगते की, हा देश एक आहे आणि एकच राहील. जिथे अभिव्यक्तीचे संरक्षक कवच होते, तिथे त्यांनी भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सत्ताधारी पक्ष 75 वर्षांसंदर्भात बोलतात. पण या वर्षांत राज्यघटनेची ज्योत कधीही मंदावली नाही. जनतेने निर्भयपणे निदर्शने केले. ती संतप्त झाल्यावर तिने सरकारला आव्हान दिले. बड्या नेत्यांवरही आरोप केले. पण आज हे वातावरण नाही. आज जनतेला सत्य बोलण्यापासून रोखले जाते. पत्रकार असो की विरोधी पक्षनेते, सर्वांची तोंडे बंद केली जातात. असे भीतीचे वातावरण ब्रिटिश सरकारच्या काळात होते. एवढेच नाही, तर "आजचे राजे भेष तर बदलतात, पण ना जनतेत जातात, ना टीका ऐकण्याची हिंमत आहे," असेही प्रियांका म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी