शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

"हे निकाल आले नसते तर..."; लोकसभेत प्रियंका गांधी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, PM मोदींवरही थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:36 IST

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जबरदस्त निशाणा साधला आहे. "लोकसभा निवडणुकीचे निकाल असे आले नसते, ...

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जबरदस्त निशाणा साधला आहे. "लोकसभा निवडणुकीचे निकाल असे आले नसते, तर हे लोक संविधान बदलायलाही तयार होते," असे प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटले आहे. वायनाडमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेतील हे त्यांचे पहिलेच भाषण होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही थेट टीका केली. "आजच्या राजाला वेष बदलणे तर माहीत आहे, मात्र जनतेत जाण्याची आणि टीका ऐकण्याची हिम्मत नाही," असे प्रियांका म्हणाल्या.

प्रियांका म्हणाल्या, आम्ही संविधानाची ज्योज जळताना बघितली आहे आणि हे एक सुरक्षा कवच असल्याचेही समजले आहे. एक असे सुरक्षा कवच, जे देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कवच आहे. मात्र, दुःखाची गोष्ट म्हणजे,  आपले सत्ताधारी पक्षातील सहकारी, जे मोठ मोठ्या गप्पा मारतात, त्यांनी गेल्या 10 वर्षांत हे सुरक्षा कवच तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. संविधानात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे वचन आहे. हे सुरक्षा कवच तोडण्याचे काम सुरू झाले आहे. लॅटरल एन्ट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमाने हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे.

प्रियांका पुढे म्हणाल्या, जर लोकसभा निवडणुकीत हे निकाल आले नसते तर, यांनी संविधान बदलायलाही सुरुवात केली असती. खरे तर, हे वारंवार संविधान-संविधान करत आहेत, कारण यांना, देशातील जनता संविधान बदू देणार नाही, हे माहीत झाले आहे. यांना पराभूत होता होता हे लक्षात आले आहे.

पंतप्रधान मोदींवर निशाणा - पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना प्रियांका म्हणाल्या, "पंतप्रधान संविधान कपाळावर लावतात, पण जेव्हा न्यायासाठी आवाज येतो, तेव्हा त्यांच्या कपाळावर सुरकुतीही नसते. भारतीय राज्यघटना हे संघाचे विधान नाही. हे त्यांना समजलेले नाही. करोडो देशवासीयांच्या हृदयात एकमेकांबद्दल प्रेम आहे, द्वेष नाही. यांच्या फुटीरतावादी धोरणांचे परिणाम आपण रोज पाहतो. राजकीय फायद्यासाठी संविधान तर सोडाच, पण देशाची एकात्मताही पणाला लावतील. संभलमध्ये पाहिले, मणिपूरमध्ये पाहिले. ते म्हणतात की देशाचे वेगवेगळे भाग आहेत. पण आपले संविधान सांगते की, हा देश एक आहे आणि एकच राहील. जिथे अभिव्यक्तीचे संरक्षक कवच होते, तिथे त्यांनी भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सत्ताधारी पक्ष 75 वर्षांसंदर्भात बोलतात. पण या वर्षांत राज्यघटनेची ज्योत कधीही मंदावली नाही. जनतेने निर्भयपणे निदर्शने केले. ती संतप्त झाल्यावर तिने सरकारला आव्हान दिले. बड्या नेत्यांवरही आरोप केले. पण आज हे वातावरण नाही. आज जनतेला सत्य बोलण्यापासून रोखले जाते. पत्रकार असो की विरोधी पक्षनेते, सर्वांची तोंडे बंद केली जातात. असे भीतीचे वातावरण ब्रिटिश सरकारच्या काळात होते. एवढेच नाही, तर "आजचे राजे भेष तर बदलतात, पण ना जनतेत जातात, ना टीका ऐकण्याची हिंमत आहे," असेही प्रियांका म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी