शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 17:46 IST

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला.

Priyanka Gandhi : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) पीपीएसची परीक्षा पुढे ढकलली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. योगी सरकार तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू इच्छित आहे, असे प्रियंका गांधी यांन म्हटले आहे. यासंदर्भात प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. 

प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, यूपी पीसीएस प्रिलिम्सची परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यूपी टेक्निकल एज्युकेशन सर्व्हिसेस-2021 च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच, वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणे, हे भाजप सरकारचे धोरण बनले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

"भाजप दलितांकडून आरक्षणाचा अधिकारही हिसकावून घेत आहे"याचबरोबर, प्रियांका गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, "स्पर्धक विद्यार्थीही यूपीपीसीएस परीक्षा दोन दिवसांत घेण्याच्या प्रस्तावाला विरोध करत आहेत. त्यांचा युक्तिवाद बरोबर आहे की, हीच परीक्षा दोन दिवसांत घेतली, तर नॉर्मसाइजेशनच्या नावाखाली पुन्हा स्केलिंगचा खेळ सुरू होईल. एकीकडे भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे, नोकऱ्या न देऊन मागासवर्गीय, दलित आणि वंचितांचा आरक्षणाचा अधिकारही हिरावून घेत आहे."

नेमक काय आहे प्रकरण?दरम्यान, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) प्रांतीय नागरी सेवा (PCS) प्राथमिक परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची यंदाची ही दुसरी वेळ आहे. आता डिसेंबरच्या मध्यात परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. अधिकृत अपडेटसाठी उमेदवारांना नियमितपणे UPPSC वेबसाइट uppsc.up.gov.in तपासण्यास सांगितले जात आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेस