शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

१५० गाड्या व ५० रेल्वे स्टेशनचेही खासगीकरण; नीती आयोगाने पाठविले रेल्वे मंडळाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 5:28 AM

देशातील रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील १५० रेल्वे गाड्या व ५० रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यासाठी सर्वाधिकार कृती दल स्थापन करण्याचे निर्देश रेल्वे मंडळाला दिले आहेत.

नवी दिल्ली : देशातील रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील १५० रेल्वे गाड्या व ५० रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यासाठी सर्वाधिकार कृती दल स्थापन करण्याचे निर्देश रेल्वे मंडळाला दिले आहेत.नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वाधिकार कृती दल स्थापन करून कालावधी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या दलामध्ये नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, व्ही. के. यादव यांच्यासह अर्थ, गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव सदस्य राहणार आहेत. रेल्वे मंडळाने देशातील ४०० स्टेशनना जागतिक दर्जा देण्याचे लक्ष्य होते. परंतु फारच थोडी स्टेशन विकसित करण्यात यश मिळाल्याचे कांत यांनी म्हटले.यासंदर्भात अमिताभ कांत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. रेल्वेच्या खासगीकरणाला वेग देऊन ५० स्टेशनचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया प्राधान्याने करण्याचे निर्देश गोयल यांनी दिले आहेत. काही दिवसांमध्ये सहा विमानतळांचे खासगीकरण करणाचा अनुभव लक्षात घेता रेल्वे स्टेशनचे खासगीकरण करण्यासाठी तीच प्रक्रिया अवलंबावी, असेही या पत्रात सुचविले आहे. पहिल्या टप्प्यात १५० रेल्वे गाड्यांचे खासगीकरण केले जाईल. पहिली खासगी रेल्वे तेजस एक्स्प्रेस लखनऊ-दिल्ली गेल्या ४ आॅक्टोबरला सुरू झाली. यात प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.कृती दल करेल शिफारसकोणत्या रेल्वेगाड्या व कोणत्या स्टेशनांचे खासगीकरण करावे, याबाबत कृती दल शिफारस करेल आणि त्याआधारे निर्णय घेण्यात येईल. सध्या कोणत्याही गाड्या वा स्टेशनांबाबत निर्णय झालेला नाही.

टॅग्स :railwayरेल्वे