शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रिझर्व बँकेच्या १.७६ लाख कोटींबाबत पंतप्रधान कार्यालयच घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 07:05 IST

अर्थ खात्यास निर्णय न घेण्याचा सल्ला; महसुली तुटीची भरपाई?

हरिश गुप्ता नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे महसुलात घट झाल्यामुळे रिझर्व बँकेकडून आलेले १.७६ लाख कोटी रुपयांच्या वापराचा निर्णय अर्थ मंत्रालय नव्हे, तर पंतप्रधान कार्यालयच घेणार आहे. या रकमेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे पंतप्रधान कार्यालयाने अर्थ मंत्रालयाला कळविले असल्याचे वृत्त आहे.

वाढती महसुली तूट भरून काढण्यासाठी सरकार ही रक्कम वापरेल, अशी टीका विरोधकांनी याआधीच केली आहे. मात्र त्यावर अर्थ मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. विमल जालान समितीच्या शिफारशीनुसार रिझर्व बँकेने आपल्या गंगाजळीतील १0 लाख कोटींपैकी १.७६ लाख कोटी रुपये केंद्राला दिले आहेत. त्या रकमेबाबत निर्णय घेण्यासाठी अर्थ मंत्रालय व पंतप्रधान कार्यालय यांची लवकरच बैठक अपेक्षित आहे.पंतप्रधान कार्यालयात लवकरच होणाऱ्या बदलांमुळे ही बैठक लांबली आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा पुढील आठवड्यात सेवामुक्त होत असून, नवे सहा अधिकारी येणार आहेत. ते आल्यानंतरच बैठक होईल, असे समजते.ही रक्कम मंदीत अडकलेल्या क्षेत्रांना मदत म्हणून देण्याऐवजी पायाभूत सुविधांसाठी व अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी वापरावी, असा एक मतप्रवाह आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच पुण्यात पत्रकारांना सांगितले की हा निधी कुठे वापरायचा, याचा निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे मी त्याविषयी सांगू शकत नाही.या निधीच्या वापराबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ आणि जाहीर करू. सीतारामन यांनी बुधवारी उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींशी बुधवारी बराच काळ चर्चा केली आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आश्वासनही दिले.तयार करणार आराखडामहसुलातील तुटीवर मार्ग काढण्यासाठी व अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी पंतप्रधान कार्यालय एक आराखडा तयार करीत आहे. त्यात कर्जे कमी करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते. रिझर्व बँकेकडून मिळालेल्या निधीच्या वापराबाबतही या आराखड्यामध्ये उल्लेख असू शकेल.

टॅग्स :businessव्यवसायprime ministerपंतप्रधानReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक