शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौभाग्य योजनेचं केलं अनावरण, आता गरिबांना मोफत वीजजोडणी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 7:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं शहर आणि गावातील गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार असून, जिथे वीज नाही तिथे सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 लेड बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे. 31 मार्च 2019पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.

नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. शहर आणि गावातील गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार असून, जिथे वीज नाही तिथे सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 लेड बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे. 31 मार्च 2019पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

गरिबांना मोफत वीज कनेक्शन देण्यासाठी सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. सौभाग्य योजनेंतर्गत 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज पोहोचवण्यात येणार आहे. प्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देण्यात येणार असून, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन पुरविणार आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही. सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदू आहे. एक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. 9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येय आहे. देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आले आहेत. आज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्त आहे. काही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होती, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाही. देशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केले. सौभाग्य योजनेचा देशातील अडीच कोटी लोकांना फायदा होणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्देदेशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आलेकाही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होतीआज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्तदेशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केलेप्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देणार, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन देणार2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाहीहर घर योजना म्हणजेच 'सौभाग्य' 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज देणारगरिबांना मोफत वीज कनेक्शन, सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणारस्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदूगरिबांचं कल्याण ही सरकारची ओळखएक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येयदेशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी