शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

दांडीबहाद्दर मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली सक्त ताकीद; हजर राहा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:08 PM

खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही खासदारांनी काम करावं.

ठळक मुद्देभाजपाची संसदीय दलाची बैठक आज पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं खासदारांना मार्गदर्शन गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीच्या संसदीय दलाची बैठक मंगळवारी संसदेच्या लायब्रेरी बिल्डींगमध्ये पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना समाजसेवा करण्याचा सल्ला दिला तसेच मंत्र्यांना सक्त ताकीद दिल्याचं पाहायला मिळालं.

मंत्रालयाच्या कार्यालयात मंत्री उपस्थित राहत नाही त्यावरुन विरोधी पक्षाची तक्रार आहे. जे मंत्री कार्यालयीन वेळेत मंत्रालयात गैरहजर राहतात अशा मंत्र्यांची नावे मागविली असून त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे अशी सक्त ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिली. 

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही खासदारांनी काम करावं. दुर्गम भागातील पसरणाऱ्या आजारावर खासदाराने काम करणं गरजेचे आहे असं पंतप्रधानांनी सांगितले. 

दरम्यान मंत्री कार्यालयात उपस्थित राहत नाही यावरुन पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त करत जे मंत्री कार्यालयात नेहमी गैरहजर राहतील अशा मंत्र्यांची नावे मला द्यावीत. मला सगळ्यांना बरोबर करता येते. राज्यसभा आणि लोकसभेत मंत्र्यांना दोन-दोन तास ड्युटी असते तरीही अनेकदा मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत. त्याबद्दल विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दांडी मारणाऱ्या मंत्र्यांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच खासदारांनीही अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणं सक्तीचं आहे असं त्यांनी सांगितले.  

 

मागील संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी खासदारांना सुनावले होते. चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात राम, सीता, लक्ष्मण हे काही काळ पंचवटीत राहिले होते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या सर्व खासदारांनी नियमित हजेरी लावली पाहिजे. त्यांनी जनकल्याणासाठी झटले पाहिजे. त्याकरिता ते ओळखले गेले पाहिजेत. अरेरावी व गैरवर्तनाच्या घटनांमुळे भाजपचे नाव खराब होते. एखाद्याकडून चूक घडली तर त्याने माफी मागण्याची तयारीही दर्शविली पाहिजे.

लोकसभेमध्ये तिहेरी तलाकविरोधी नवे विधेयक मांडण्यात आले त्यावेळी सभागृहात कमी संख्येने भाजप खासदार हजर होते. त्याविषयीही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली होती.  तसेच भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान पाच झाडे लावावीत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला होता. या वृक्षलागवड कार्यक्रमाला त्यांनी पंचवटी असे नाव दिले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाministerमंत्रीMember of parliamentखासदार