शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पंतप्रधानांची शिस्त आणि प्रदूषणाविषयीची चिंता; कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 09:14 IST

कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात आहे. दिवाळीच्या दिवशी येथील वायु गुणवत्ता निर्देशांक १००० वर गेला होता. अजुनही येथील प्रदूषण धोकादायक पातळीत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत असतातच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहनांची अनावश्यक एनर्जी वाचविण्याचा व प्रदूषण टाळण्यासाठी अभिनव प्रयोग सुरू केला आहे. 

दर पंधरा दिवसाला पंतप्रधान मंत्री परिषदेची बैठक घेत असतात. येथील सुषमा स्वराज मेमोरियल हॉलमध्ये ही बैठक पार पडते. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, २ स्वतंत्र प्रभार असलेले, तर ४५ राज्यमंत्री आहेत. या बैठकीला आता कॅबिनेट मंत्र्यांच्या वाहनातून दोन राज्यमंत्री येतात. यामुळे वाहनांचा ताफा एकतृतीयांश कमी होतो.

मंत्र्यांच्या मागेपुढे असणाऱ्या सुरक्षा वाहनांनाही फाटा देण्यात आला आहे. प्रदूषण आणि अनावश्यक वाहने पाहता मोदींनी ‘कार पूल’ करण्याचा हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. प्रत्येक मंत्र्याने त्यांच्या विभागात फेरफटका मारून अधिकारी ते कारकुनापर्यंत सगळ्यांशी चर्चा करावी, त्यांच्या संपर्कात असावे आणि मंत्र्यांच्या टेबलावर कोणतीही फाइल चार दिवसांपेक्षा अधिक काळ पडून राहू नये, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.

  • कोणत्या कॅबिनेट मंत्र्यांसह तुम्ही बैठकीला यायचे आहे याची सूचना राज्यमंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून देण्यात येते. या प्रवासातून कॅबिनेट व राज्यमंत्र्यामध्ये सौहार्द, संवाद वाढविणे हाही उद्देश आहे. 
  • विशेष म्हणजे या बैठकीत पंतप्रधान सगळ्यात मागे बसतात. ज्या मंत्र्यांचे नाव घेतले गेले की, त्याने आपल्या विभागाने काय केले, याबाबतचा आढावा सादर करायचा असतो. 
  • यात केवळ २० मंत्र्यांचा नंबर लागतो. परंतु कोणत्या मंत्र्यांचे नाव पुकारले जाईल हे त्या वेळेपर्यंत त्या मंत्र्यालाही माहीत नसते. त्यामुळे सगळेच संपूर्ण तयारीनिशी जातात. 
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीenvironmentपर्यावरणIndiaभारत