शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंतप्रधानांची शिस्त आणि प्रदूषणाविषयीची चिंता; कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 09:14 IST

कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात आहे. दिवाळीच्या दिवशी येथील वायु गुणवत्ता निर्देशांक १००० वर गेला होता. अजुनही येथील प्रदूषण धोकादायक पातळीत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत असतातच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहनांची अनावश्यक एनर्जी वाचविण्याचा व प्रदूषण टाळण्यासाठी अभिनव प्रयोग सुरू केला आहे. 

दर पंधरा दिवसाला पंतप्रधान मंत्री परिषदेची बैठक घेत असतात. येथील सुषमा स्वराज मेमोरियल हॉलमध्ये ही बैठक पार पडते. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, २ स्वतंत्र प्रभार असलेले, तर ४५ राज्यमंत्री आहेत. या बैठकीला आता कॅबिनेट मंत्र्यांच्या वाहनातून दोन राज्यमंत्री येतात. यामुळे वाहनांचा ताफा एकतृतीयांश कमी होतो.

मंत्र्यांच्या मागेपुढे असणाऱ्या सुरक्षा वाहनांनाही फाटा देण्यात आला आहे. प्रदूषण आणि अनावश्यक वाहने पाहता मोदींनी ‘कार पूल’ करण्याचा हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. प्रत्येक मंत्र्याने त्यांच्या विभागात फेरफटका मारून अधिकारी ते कारकुनापर्यंत सगळ्यांशी चर्चा करावी, त्यांच्या संपर्कात असावे आणि मंत्र्यांच्या टेबलावर कोणतीही फाइल चार दिवसांपेक्षा अधिक काळ पडून राहू नये, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.

  • कोणत्या कॅबिनेट मंत्र्यांसह तुम्ही बैठकीला यायचे आहे याची सूचना राज्यमंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून देण्यात येते. या प्रवासातून कॅबिनेट व राज्यमंत्र्यामध्ये सौहार्द, संवाद वाढविणे हाही उद्देश आहे. 
  • विशेष म्हणजे या बैठकीत पंतप्रधान सगळ्यात मागे बसतात. ज्या मंत्र्यांचे नाव घेतले गेले की, त्याने आपल्या विभागाने काय केले, याबाबतचा आढावा सादर करायचा असतो. 
  • यात केवळ २० मंत्र्यांचा नंबर लागतो. परंतु कोणत्या मंत्र्यांचे नाव पुकारले जाईल हे त्या वेळेपर्यंत त्या मंत्र्यालाही माहीत नसते. त्यामुळे सगळेच संपूर्ण तयारीनिशी जातात. 
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीenvironmentपर्यावरणIndiaभारत