शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

NDA च्या बैठकीत पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंवर बरसले; २०१४ ते २०२३ सगळंच काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 09:46 IST

आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

नवी दिल्ली – गेल्या आठवड्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांची बैठक घेत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची बैठक मोदींनी घेतली. या बैठकीत मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचा आहे. त्याचसोबत आगामी निवडणुकीसाठी खासदारांना कानमंत्र दिले. या बैठकीत मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजपा काँग्रेससारखी अहंकारी नाही असं मोदींनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्या लोकांनी सत्तेत राहून चुकीची कामे केली मी त्याचे तिकीटही कापले आहे. निवडणूक प्रचारात चुकीसाठी माफीही मागितली आहे. काँग्रेस आणि शरद पवारांनी घराणेशाहीत अनेक कर्तृत्वान लोकांना पुढे येता आले नाही. जेव्हा पंतप्रधान बनल्यानंतर मी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी म्हटलं, तुमच्या पक्षाने पहिल्यांदाच पंतप्रधानपदाचा उमेदवार तुम्हाला बनवलं आणि तुमच्या नावावर बहुमत मिळाले असंही त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करत राहिले. आम्ही एकत्रित निवडणूक लढवल्या आणि जिंकल्याही. जे पक्ष एनडीएत सहभागी होतात त्यांचे स्वागत आहे. आम्हाला एनडीएचा विस्तार करायचा आहे. देशाच्या विकासाच्या मार्गावर महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण राज्य आहे. सत्तेत असतानाही शिवसेना टीका करायची. विनाकारण वाद उकरून काढायची. आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

दरम्यान, बिहारमध्ये संख्याबळ कमी असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. एकनाथ शिंदे आमच्याकडे आले, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवले. आमच्यासाठी मैत्री महत्त्वाची आहे. आम्ही सोबत राहू, सर्वांचा सन्मान करू. भाजपा काँग्रेससारखी अहंकारी नाही त्यामुळे भाजपा सत्तेपासून दूर जाणार नाही असा विश्वासही मोदींनी एनडीए खासदारांच्या बैठकीत व्यक्त केला.

महाराष्ट्र-राजस्थान निवडणूक जिंकणं गरजेचं

देशाच्या समृद्धीसाठी महाराष्ट्र समृद्ध होणे आवश्यक आहे. ३ पक्षांना मिळून काम करायचंय. राजस्थानात कुठल्याही सरकारच्या काळात इतकी वाईट अवस्था नव्हती, जितकी आता आहे. भारताच्या विकासासाठी महाराष्ट्र, राजस्थान निवडणूक जिंकणे गरजेचे आहे. मी वैयक्तिकरित्या घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या विरोधात क्विट इन इंडिया कार्यक्रम चालवा असंही मोदींनी म्हटलं.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा