शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
2
PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
3
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
4
तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू
5
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
6
मकर संक्रांत २०२६: संक्रांत सण असूनही त्याला 'नकारात्मक' छटा का? रंजक आणि शास्त्रीय कारण माहितीय?
7
Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर; विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य
8
आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक इनसाईड स्टोरी
9
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
10
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
11
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज
12
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
13
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
14
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
15
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
16
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
17
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
18
Bhogi Festival 2026: खेंगट, बाजरीची भाकरी आणि लोणी; संक्रांतीच्या आधी भोगी का महत्त्वाची?
19
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
20
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:42 IST

PM Modi On 1975 Emergency: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयाला आज ५० वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.  इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली, हा तोच काळ आहे, जेव्हा काँग्रेसने लोकशाहीला ओलीस ठेवले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

"कोणाताही भारतीय आणीबाणीचा काळ विसरू शकत नाही. त्यावेळी संसदेचा आवाज दाबण्यात आला आणि न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४२ वी घटनादुरुस्ती ही त्यांच्या कृतींचे एक उत्तम उदाहरण आहे", असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

"आणीबाणीविरुद्धच्या लढाईत ठाम राहिलेल्या प्रत्येकाला आम्ही सलाम करतो. त्यावेळी वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांसोबत काम केले. भारताच्या लोकशाही रचनेचे रक्षण करणे, हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्संचयित करावी लागली आणि निवडणुका घ्याव्या लागल्या, ज्यात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावा लागले", असेही मोदी म्हणाले.

पुढे मोदी म्हणाले की, "जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा मी संघाचा एक तरुण प्रचारक होतो. आणीबाणीविरोधी चळवळीदरम्यान राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने त्यातील काही अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला आहे, याचा मला आनंद आहे. या पुस्तकाची प्रस्तावना एचडी देवेगौडा यांनी लिहिली आहे, जे स्वत: आणीबाणीविरोधी चळवळीचा चेहरा होते."

"आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसांची आठवण असलेल्या किंवा ज्यांच्या कुटुंबांनी त्या काळात त्रास सहन केला आहे, अशा सर्वांना मी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर करण्याचे आवाहन करतो. यामुळे १९७५ ते १९७७ या लज्जास्पद काळाबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होईल", असे मोदींनी म्हटले आहे. तसेच आपल्या संविधानात नमूद केलेल्या तत्त्वांना बळकटी देण्यासाठी आणि विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकत्र काम करत आहोत. आपण प्रगतीच्या नवीन उंची गाठू आणि गरीब आणि वंचितांची स्वप्ने पूर्ण करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा