शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:42 IST

PM Modi On 1975 Emergency: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयाला आज ५० वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.  इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली, हा तोच काळ आहे, जेव्हा काँग्रेसने लोकशाहीला ओलीस ठेवले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

"कोणाताही भारतीय आणीबाणीचा काळ विसरू शकत नाही. त्यावेळी संसदेचा आवाज दाबण्यात आला आणि न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४२ वी घटनादुरुस्ती ही त्यांच्या कृतींचे एक उत्तम उदाहरण आहे", असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

"आणीबाणीविरुद्धच्या लढाईत ठाम राहिलेल्या प्रत्येकाला आम्ही सलाम करतो. त्यावेळी वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांसोबत काम केले. भारताच्या लोकशाही रचनेचे रक्षण करणे, हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्संचयित करावी लागली आणि निवडणुका घ्याव्या लागल्या, ज्यात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावा लागले", असेही मोदी म्हणाले.

पुढे मोदी म्हणाले की, "जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा मी संघाचा एक तरुण प्रचारक होतो. आणीबाणीविरोधी चळवळीदरम्यान राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने त्यातील काही अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला आहे, याचा मला आनंद आहे. या पुस्तकाची प्रस्तावना एचडी देवेगौडा यांनी लिहिली आहे, जे स्वत: आणीबाणीविरोधी चळवळीचा चेहरा होते."

"आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसांची आठवण असलेल्या किंवा ज्यांच्या कुटुंबांनी त्या काळात त्रास सहन केला आहे, अशा सर्वांना मी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर करण्याचे आवाहन करतो. यामुळे १९७५ ते १९७७ या लज्जास्पद काळाबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होईल", असे मोदींनी म्हटले आहे. तसेच आपल्या संविधानात नमूद केलेल्या तत्त्वांना बळकटी देण्यासाठी आणि विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकत्र काम करत आहोत. आपण प्रगतीच्या नवीन उंची गाठू आणि गरीब आणि वंचितांची स्वप्ने पूर्ण करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा