शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day : पंतप्रधान मोदींनी केली 'आयुष्यमान भारत' योजनेची घोषणा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 09:31 IST

देशातील तब्बल 10 कोटी गरीब नागरिकांना लाभ मिळणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनावेळी लाल किल्ल्यावरून सर्वसामान्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेची घोषणा केली. या योजनेद्वारे देशातील तब्बल 10 कोटी गरीब नागरिकांना लाभ मिळणार आहे. मात्र, ही योजना 15 ऑगस्टपासून सुरु होणार नाही. तर, यासाठी सव्वा महिना वाट पहावी लागणार आहे. यापूर्वी ही आयुष्यमान भारत योजना 15 ऑगस्टपासून लागू होणार असल्याचे सांगितले जात होते. 

  अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या देशातील नागरिकांसाठी 'ओबामा केअर ' ही योजना लागू केली होती. मात्र, या योजनेला अमेरिकेमध्ये तीव्र विरोध झाला होता. या सारखीच एक महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव आयुष्यमान भारत योजना असे आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेची सुरुवात प्रथम छत्तीसगड, मध्य प्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दीव-दमन या केंद्र शासित प्रदेशामध्ये केली जाणार आहे. 

या योजनेपासून अद्याप दिल्ली, पंजाब, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगाना, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही महत्वाची राज्ये लांबच असल्याचे समजते. कारण या योजनेत सहभागी होण्यासाठी या राज्यांनी करार केलेला नाही. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील हॉस्पिटल्सकडून  या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज मागविले होते. केंद्र सरकार ही योजना राबविण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती करणार आहे. हे कर्मचारी योजनेंतर्गत नागरिकांचा विमा काढण्यासोबतच त्यांना आजारपणात उपचार मिळण्याची सोयही करणार आहेत. या आरोग्य मित्रांना वेतनासह इन्सेंटिवदेखील मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत या योजनेची केवळ घोषणाच केली आहे. मात्र ही योजना पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 25 सप्टेंबरपासून लागू केली जाणार आहे. यामुळे करोडो गरीबांना आणखी सव्वा महिना थांबावे लागणार आहे. यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या योजनेची घोषणा केली होती. 

काय आहे ही योजना...

  • 10.7 कोटी गरीब कुटुंबियांना जोडण्याचे लक्ष्य
  • प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांचे आरोग्य विमा कवच
  • आर्थिक निकषांवर कुटुंबाची निवड होणार 
  • पुर्णपणे कॅशलेस सुविधा
  • 1.5 लाख आरोग्य  केंद्र सुरु करणार 
  • खासगी कंपन्यांनाही सहभागी होता येईल
  • केंद्र सरकार 60 तर राज्य सरकार 40 टक्के खर्च उचलणार 
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHealthआरोग्यIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९