शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day : पंतप्रधान मोदींनी केली 'आयुष्यमान भारत' योजनेची घोषणा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 09:31 IST

देशातील तब्बल 10 कोटी गरीब नागरिकांना लाभ मिळणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनावेळी लाल किल्ल्यावरून सर्वसामान्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेची घोषणा केली. या योजनेद्वारे देशातील तब्बल 10 कोटी गरीब नागरिकांना लाभ मिळणार आहे. मात्र, ही योजना 15 ऑगस्टपासून सुरु होणार नाही. तर, यासाठी सव्वा महिना वाट पहावी लागणार आहे. यापूर्वी ही आयुष्यमान भारत योजना 15 ऑगस्टपासून लागू होणार असल्याचे सांगितले जात होते. 

  अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या देशातील नागरिकांसाठी 'ओबामा केअर ' ही योजना लागू केली होती. मात्र, या योजनेला अमेरिकेमध्ये तीव्र विरोध झाला होता. या सारखीच एक महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव आयुष्यमान भारत योजना असे आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेची सुरुवात प्रथम छत्तीसगड, मध्य प्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दीव-दमन या केंद्र शासित प्रदेशामध्ये केली जाणार आहे. 

या योजनेपासून अद्याप दिल्ली, पंजाब, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगाना, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही महत्वाची राज्ये लांबच असल्याचे समजते. कारण या योजनेत सहभागी होण्यासाठी या राज्यांनी करार केलेला नाही. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील हॉस्पिटल्सकडून  या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज मागविले होते. केंद्र सरकार ही योजना राबविण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती करणार आहे. हे कर्मचारी योजनेंतर्गत नागरिकांचा विमा काढण्यासोबतच त्यांना आजारपणात उपचार मिळण्याची सोयही करणार आहेत. या आरोग्य मित्रांना वेतनासह इन्सेंटिवदेखील मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत या योजनेची केवळ घोषणाच केली आहे. मात्र ही योजना पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 25 सप्टेंबरपासून लागू केली जाणार आहे. यामुळे करोडो गरीबांना आणखी सव्वा महिना थांबावे लागणार आहे. यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या योजनेची घोषणा केली होती. 

काय आहे ही योजना...

  • 10.7 कोटी गरीब कुटुंबियांना जोडण्याचे लक्ष्य
  • प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांचे आरोग्य विमा कवच
  • आर्थिक निकषांवर कुटुंबाची निवड होणार 
  • पुर्णपणे कॅशलेस सुविधा
  • 1.5 लाख आरोग्य  केंद्र सुरु करणार 
  • खासगी कंपन्यांनाही सहभागी होता येईल
  • केंद्र सरकार 60 तर राज्य सरकार 40 टक्के खर्च उचलणार 
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHealthआरोग्यIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९