शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राफेल विमानांची किंमत सांगा मोदीजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:19 AM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका करताना, मोदी यांनी आधी राफेल लढाऊ विमानांच्या किंमती जाहीर करा, अशी मागणी केली आणि जुनेच मुद्दे भाषणातून पुन्हा पुन्हा ऐकवू नका, असे सुनावले.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका करताना, मोदी यांनी आधी राफेल लढाऊ विमानांच्या किंमती जाहीर करा, अशी मागणी केली आणि जुनेच मुद्दे भाषणातून पुन्हा पुन्हा ऐकवू नका, असे सुनावले.मोदी लोकसभेत तब्बल दीड तास बोलत होते. पण संपूर्ण भाषणात त्यांनी राफेल विमाने भारताने केवढ्याला विकत घेतली, याचे उत्तर दिले नाही. देशातील शेतकºयांच्या स्थितीवर त्यांनी शब्द उच्चारला नाही आणि तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाबद्दलही ते काहीच बोलले नाही.काँग्रेसने देशाची फाळणी केली, या मोदी यांच्या आरोपाला उत्तर देताना राहुल म्हणाले की, आज देशात केवळ काँग्रेस व जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच लोकशाही टिकून आहे, हे लक्षात ठेवावे. पंतप्रधानांनी वाटल्यास इतिहास बारकाईने वाचावा. राफेल विमानांची किंमत विचारताच संरक्षणमंत्री गुप्ततेचे कारण सांगतात, देशहिताचा विषय काढतात. राफेर विमानांच्या किंमती गुप्त ठेवण्याचे कारणच काय?।मल्लिकार्जुन खडगे यांचा हल्लाबोलकाँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खडगे यांनीही मोदी यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, मोदी माझ्यावर सतत टीका करीत होते. लोकसभेत बसलेले सारे सदस्य कर्नाटकातील आहेत, असे समजून मोदी बोलत होेते. कर्नाटकात निवडणुका जिंकू पाहणारे मोदी व त्यांचा पक्ष राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळ्याबद्दल का बोलायला तयार नाहीत? या विमानांची किंमत तिप्पट कशामुळे झाली? जे कंत्राट सरकारी उपक्रमाला मिळणार होते, ते एका खासगी कंपनीला, विशिष्ट उद्योगपतीला का देण्यात आले? या साºयांची उत्तरे पंतप्रधानांनी द्यायला हवीत.।लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्या!मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर ज्या पद्धतीने टीका केली, त्यामुळे संतापलेले राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी भलतेच विषय काढून लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यावरून दूर हटवण्याचीसवयच आहे. आपण पंतप्रधान आहोत,हेही त्यांच्या लक्षात राहत नाही. सतत विरोधकांवर टीका करणे हे सरकारचे काम नसून, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण जनतेला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, त्याबाबत ते गप्पच राहतात. जाहीर सभांमध्ये त्यांनी आमच्यावर अवश्य टीकाकरावी. पण संसदेची प्रतिष्ठा त्यांनी ठेवायला हवी.तिथे त्या पद्धतीने वागायला हवे.।सोनिया गांधी यांचीही टीकासोनिया गांधी यांनी मोदी यांच्या भाषणावर सडकून टीका केली. पंतप्रधानांच्या भाषणात एकही गोष्ट नवी नव्हती, एक ते दीड तास ते सतत जुन्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत होते. लोकांना त्यात रस नाही. तरुणांना रोजगार व भवितव्य याची चिंता आहे. पण त्याविषयी मोदी बोलायलाच तयार नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी