शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या मुद्यांपासून दूर राहा- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 8:24 PM

सध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन

नवी दिल्ली: देश सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं. ते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करत होते. देशातील प्रत्येक नागरिकाचं देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं. राष्ट्रपतींनी देशवासींयाना संबोधित करताना केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक केलं. 'देशातील परिस्थिती झपाट्यानं बदलत असून वेगानं विकास होत आहे. याचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे,' असं कोविंद म्हणाले. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाचा विशेष उल्लेख केला. 'महात्मा गांधींना पूर्ण जगात सन्मान दिला जातो. संपूर्ण जग त्यांचा आदर करतं. त्यांचे आदर्श आपण समजून घ्यायला हवेत. गांधीजींनी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली होती. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छतेला प्राधान्य दिलं होतं,' अशा शब्दांमध्ये त्यांनी गांधीजींचं स्मरण केलं. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात महिलांचाही विशेष उल्लेख केला. 'आपल्या समाजात महिलांची विशेष भूमिका आहे. महिलांना व्यापक स्वातंत्र्य मिळाल्यास देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचं सार्थक होईल', असं राष्ट्रपती म्हणाले. 'कुटुंबातील मातांना, बहिणींना, मुलींना घरात आणि घराबाहेरील निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. महिलांना त्यांच्या क्षमतांचा विकास आणि वापर करण्याची संधी द्यायला हवी. महिलांना सुरक्षित वातावरण आणि विकासाच्या संधी मिळायला हव्यात,' असंही कोविंद यांनी म्हटलं.  

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndependence Dayस्वातंत्र्य दिवसNarendra Modiनरेंद्र मोदी