शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

President Election: शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता गांधींचे नातू बनणार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:21 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत बैठकीचं आयोजन करत देशातील प्रमुख २२ नेत्यांना निमंत्रण पाठवलं होते.

नवी दिल्ली - देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधीपक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असणार? यावर अद्याप स्पष्टता नाही. मात्र विरोधी पक्षाच्या संयुक्त बैठकीत त्यावर निर्णय होईल. परंतु तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एकतर्फी अशी बैठक बोलावल्याने कम्युनिट पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. तर आप, टीआरएस या बैठकीत सहभागी होणार नाही. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत बैठकीचं आयोजन करत देशातील प्रमुख २२ नेत्यांना निमंत्रण पाठवलं होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मात्र येंचुरी यांनी पत्र लिहून बैठक बोलावण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांमध्ये चर्चा होऊन अशाप्रकारे बैठकीचं आयोजन केले जाते. जेणेकरून या बैठकीला जास्तीत जास्त पक्षांना सहभागी होता येईल. परंतु यंदा तारीख, वेळ, स्थळ आणि अजेंडा माहिती देणारं एकतर्फी पत्र मिळालं. या पत्रात आणि बैठकीत केवळ ३ दिवसांचे अंतर होते. जर योग्य प्रकारे चर्चा करून बैठकीचं आयोजन केले असते तर कदाचित जास्त प्रतिसाद मिळाला असता अशी नाराजी सीताराम येंचुरी यांनी व्यक्त केली आहे. 

राष्ट्रपती निवडणूक लढवणार नाही - पवारममता बॅनर्जी यांनी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदासाठी संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती केली. परंतु शरद पवारांनी(Sharad Pawar) विरोधकांची ही ऑफर नाकारली. सीताराम येंचुरी म्हणाले की, पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अन्य नावाचा विचार केला जाऊ शकतो. विरोधी पक्षाच्या सूत्रांनुसार, शरद पवार अशा निवडणुकीत उभे राहण्यास इच्छुक नाहीत ज्यात त्यांच्या राजकीय जीवनात पराभव सहन करावा लागू शकतो. 

गोपाळकृष्ण गांधी विरोधी पक्षाचे उमेदवार?राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता विरोधकांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी(Gopalkrishna Gandhi) यांच्याशी संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गांधी २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. परंतु व्यैकया नायडू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काही विरोधी पक्षातील नेत्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती करत विचार करण्याचा आग्रह केला आहे. 

कोण आहेत गोपाळकृष्ण गांधी?विरोधी पक्षांकडून अन्य नावांचाही विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी हे २००४ ते २००९ या काळात पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म २२ एप्रिल १९४५ रोजी महात्मा गांधी यांचे छोटे चिरंजीव देवदास गांधी यांच्या घरी झाला. १९६८ ते १९९२ पर्यंत गोपाळकृष्ण गांधी आयएएस अधिकारी होते. १९९२ मध्ये त्यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली. १९८५ ते १९८७ काळात हे उपराष्ट्रपती कार्यालयात सचिव होते. 

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षSharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जी