शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

दिल्लीत कृत्रिम पावसाची तयारी?; केजरीवाल सरकारची आयआयटी टीमसोबत महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 20:05 IST

दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता खूप खालावली आहे.

नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता खूप खालावली आहे. प्रदूषणाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीचे केजरीवाल सरकार रोज नवीन निर्णय घेत आहे. याचदरम्यान, दिल्लीत पहिल्यांदाच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. 

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आयआयटी कानपूरच्या टीमसोबत कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत बैठक बोलावली होती. यामध्ये आयआयटी कानपूरने संपूर्ण योजना दिल्ली सरकारला सादर केली आहे. आता शुक्रवारी दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती देणार आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळावे, अशी विनंती दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयाला करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी गेल्या अनेक वर्षांपासून 'गंभीर' श्रेणीत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही प्रदूषणाच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले होते.दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. दरम्यान, दिल्ली सरकारने शाळांना हिवाळी सुट्ट्या आधीच दिल्या आहेत. आता ९ ते १८ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच इतर राज्यांमध्ये नोंदणी केलेल्या कॅबनाही दिल्लीत प्रवेश मिळणार नाही. यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांवर किती काळ बंदी लागू राहील हे सध्या स्पष्ट नाही. 

१३ नोव्हेंबरपासून दिल्लीत सम-विषम प्रणाली लागू होणार-

दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, ऍलर्जी अशा आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीचे केजरीवाल सरकार विविध पावले उचलत आहे. केजरीवाल सरकारने नुकतेच १३ नोव्हेंबरपासून सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणRainपाऊसdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल