शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

दिल्लीत कृत्रिम पावसाची तयारी?; केजरीवाल सरकारची आयआयटी टीमसोबत महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 20:05 IST

दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता खूप खालावली आहे.

नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता खूप खालावली आहे. प्रदूषणाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीचे केजरीवाल सरकार रोज नवीन निर्णय घेत आहे. याचदरम्यान, दिल्लीत पहिल्यांदाच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. 

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आयआयटी कानपूरच्या टीमसोबत कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत बैठक बोलावली होती. यामध्ये आयआयटी कानपूरने संपूर्ण योजना दिल्ली सरकारला सादर केली आहे. आता शुक्रवारी दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती देणार आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळावे, अशी विनंती दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयाला करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी गेल्या अनेक वर्षांपासून 'गंभीर' श्रेणीत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही प्रदूषणाच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले होते.दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. दरम्यान, दिल्ली सरकारने शाळांना हिवाळी सुट्ट्या आधीच दिल्या आहेत. आता ९ ते १८ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच इतर राज्यांमध्ये नोंदणी केलेल्या कॅबनाही दिल्लीत प्रवेश मिळणार नाही. यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांवर किती काळ बंदी लागू राहील हे सध्या स्पष्ट नाही. 

१३ नोव्हेंबरपासून दिल्लीत सम-विषम प्रणाली लागू होणार-

दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, ऍलर्जी अशा आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीचे केजरीवाल सरकार विविध पावले उचलत आहे. केजरीवाल सरकारने नुकतेच १३ नोव्हेंबरपासून सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणRainपाऊसdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल