शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 17:03 IST

मागील वर्षी भारतीय लष्करात अग्निवीर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेत मोठे बदल होऊ शकतात असं बोललं जात आहे.

मागील वर्षी भारतीय लष्करात अग्निवीर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेत मोठे बदल होऊ शकतात असं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी अग्निवीर योजनेचा मुद्दा जनतेमध्ये जोरात मांडला होता. दरम्यान, भाजपने सरकार स्थापन केल्यावर त्यांच्या मित्रपक्षाने अग्निपथ योजनेत बदल करण्याची मागणीही केली होती.

POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...

अग्निपथ योजना लागू होऊन दीड वर्ष झाले असून या दीड वर्षांत या योजनेचा आढावा घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीएमए म्हणजेच लष्करी व्यवहार विभागाने तिन्ही लष्करांकडून याबाबत अहवाल मागवला आहे. चार वर्षांचा कार्यकाळ वाढवणे, अधिक भरती करणे आणि २५ टक्के कायम ठेवण्याची मर्यादा वाढवणे अशी चर्चा सुरू आहे. याशिवाय प्रशिक्षणादरम्यान किंवा कर्तव्यावर असताना अग्निवीर जावानाचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

नियमित लष्करी जवान आणि अग्निवीर यांना दिलेल्या रजेतील फरक यातही बदल केले जाऊ शकतात. अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला बाहेर पडण्यासाठी अजून अडीच वर्षांचा अवधी आहे, त्यामुळे काही बदल करायचे असतील तर ते पहिली बॅच बाहेर पडल्यापूर्वीच करावे लागणार आहेत.

नेपाळमधील भरती कमी झाली

ही योजना सुरू झाल्यापासून नेपाळमध्ये एकही भरती आयोजित केलेला नाही. कोरोनाच्या काळात जवळपास अडीच वर्षे आणि अग्निपथ योजना लागू झाल्यापासून जवळपास दीड वर्ष म्हणजेच गेल्या चार वर्षांपासून नेपाळी गोरखा सैनिकांची भारतीय सैन्यात भरती झालेली नाही. स्वातंत्र्यापूर्वी, गोरखा रेजिमेंटमधील सुमारे ९० टक्के गोरखा सैनिक नेपाळचे होते आणि १० टक्के भारतीय गोरखा होते, पुढे ही टक्केवारी ८०:२० पर्यंत वाढली. नंतर ते ६०:४० पर्यंत वाढवण्यात आले. म्हणजेच ६० टक्के नेपाळी अधिवास गोरखा आणि ४० टक्के भारतीय अधिवास गोरखा.

भारतीय सैन्याला नेपाळमधून गोरखा सैनिकांची पूर्ण संख्या मिळत असताना, भारतीय अधिवासित गोरखांच्या संख्येत ४० टक्क्यांनी मोठी घट झाली होती, पण अग्निवीर योजनेनंतर हे उलट झाले आहे, आता भारतीय गोरखा मिळत आहेत पण नेपाळी मिळत नाहीत. या योजनेमुळे नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये काही तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाBJPभाजपाAmit Shahअमित शाहIndian Armyभारतीय जवान