शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 17:03 IST

मागील वर्षी भारतीय लष्करात अग्निवीर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेत मोठे बदल होऊ शकतात असं बोललं जात आहे.

मागील वर्षी भारतीय लष्करात अग्निवीर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेत मोठे बदल होऊ शकतात असं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी अग्निवीर योजनेचा मुद्दा जनतेमध्ये जोरात मांडला होता. दरम्यान, भाजपने सरकार स्थापन केल्यावर त्यांच्या मित्रपक्षाने अग्निपथ योजनेत बदल करण्याची मागणीही केली होती.

POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...

अग्निपथ योजना लागू होऊन दीड वर्ष झाले असून या दीड वर्षांत या योजनेचा आढावा घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीएमए म्हणजेच लष्करी व्यवहार विभागाने तिन्ही लष्करांकडून याबाबत अहवाल मागवला आहे. चार वर्षांचा कार्यकाळ वाढवणे, अधिक भरती करणे आणि २५ टक्के कायम ठेवण्याची मर्यादा वाढवणे अशी चर्चा सुरू आहे. याशिवाय प्रशिक्षणादरम्यान किंवा कर्तव्यावर असताना अग्निवीर जावानाचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

नियमित लष्करी जवान आणि अग्निवीर यांना दिलेल्या रजेतील फरक यातही बदल केले जाऊ शकतात. अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला बाहेर पडण्यासाठी अजून अडीच वर्षांचा अवधी आहे, त्यामुळे काही बदल करायचे असतील तर ते पहिली बॅच बाहेर पडल्यापूर्वीच करावे लागणार आहेत.

नेपाळमधील भरती कमी झाली

ही योजना सुरू झाल्यापासून नेपाळमध्ये एकही भरती आयोजित केलेला नाही. कोरोनाच्या काळात जवळपास अडीच वर्षे आणि अग्निपथ योजना लागू झाल्यापासून जवळपास दीड वर्ष म्हणजेच गेल्या चार वर्षांपासून नेपाळी गोरखा सैनिकांची भारतीय सैन्यात भरती झालेली नाही. स्वातंत्र्यापूर्वी, गोरखा रेजिमेंटमधील सुमारे ९० टक्के गोरखा सैनिक नेपाळचे होते आणि १० टक्के भारतीय गोरखा होते, पुढे ही टक्केवारी ८०:२० पर्यंत वाढली. नंतर ते ६०:४० पर्यंत वाढवण्यात आले. म्हणजेच ६० टक्के नेपाळी अधिवास गोरखा आणि ४० टक्के भारतीय अधिवास गोरखा.

भारतीय सैन्याला नेपाळमधून गोरखा सैनिकांची पूर्ण संख्या मिळत असताना, भारतीय अधिवासित गोरखांच्या संख्येत ४० टक्क्यांनी मोठी घट झाली होती, पण अग्निवीर योजनेनंतर हे उलट झाले आहे, आता भारतीय गोरखा मिळत आहेत पण नेपाळी मिळत नाहीत. या योजनेमुळे नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये काही तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाBJPभाजपाAmit Shahअमित शाहIndian Armyभारतीय जवान