शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कर्नाटकात ऑपरेशन कमळची तयारी, आमदरांच्या खरेदीसाठी 100 कोटींची ऑफर; काँग्रेसचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 17:36 IST

"रविकुमार गौडा म्हणाले, 'मी आजही म्हणत आहे की, त्यांनी (भाजप) आता 50 कोटी रुपयांची ऑफर वाढवून 100 कोटी रुपये केली आहे. परवा कोणी फोन करून..."

कर्नाटकातील मांड्या येथील काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी रविवारी विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर 'ऑपरेशन लोटस'च्या तयारीचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी 100 कोटी रुपयांची ऑफर देऊन काँग्रेस आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, एकही आमदार त्याच्या झाळ्यात अडकणार नाही. राज्यातील काँग्रेसचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

रविकुमार गौडा म्हणाले, 'मी आजही म्हणत आहे की, त्यांनी (भाजप) आता 50 कोटी रुपयांची ऑफर वाढवून 100 कोटी रुपये केली आहे. परवा कोणी फोन करून 100 कोटी रुपये तयार असल्याचे सांगितले होते. त्यांना 50 आमदार खरेदी करायचे आहेत. भाजपचे लोक 50 कोटींवरून 100 कोटींवर पोहोचले आहेत. ते म्हणाले, मला कुणीतरी फोन केला होता, मी त्याला म्हणालो 100 कोटी रुपये आपल्याकडेच ठेवा. मी ईडीकडे तक्रार करण्याचा विचार केला. ते सातत्याने आमचे सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत. मात्र आमचे सरकार स्थिर असून मुख्यमंत्रीही मजबूत आहेत.

"4 आमदारांसोबत साधला गेला संपर्क" -यापूर्वी, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही गौडा यांनी असाच दावा केला होता. एका चमूने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. 4 आमदारांसोबत संपर्क साधण्यात आला होता. याचे पुरावे आहेत, असा दावा त्यांनी केला होता. गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, प्रल्हाद जोशी आणि एचडी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) यांच्यावर आरोप केले होते.

गौडा म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी हे लोक एका टोळीच्या स्वरुपात काम करत आहेत. मात्र, 136 आमदार असलेले काँग्रेस सरकार मजबूत आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री गरिबांचे हितचिंतक असून त्यांना कोणीही हटवू शकत नाही.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस