सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य द्या
By Admin | Updated: March 21, 2015 00:12 IST2015-03-20T22:40:01+5:302015-03-21T00:12:08+5:30
गुंतवणूक जागर : तज्ज्ञांनी दाखवला गुंतवणुकीचा मार्ग

सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य द्या
गुंतवणूक जागर : तज्ज्ञांनी दाखवला गुंतवणुकीचा मार्ग
नाशिक : जास्त परताव्याची अपेक्षा करताना गुंतवणुकीच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या असा सल्ला विविध क्षेत्रांतील गुंतवणूक सल्लागारांनी दिला.
नाशिक युथ प्रतिष्ठानच्या वतीने कालिदास कलामंदिर येथे आयोजित गुंतवणूक जागर या कार्यक्रमात हा सल्ला देण्यात आला. विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गुंतवणूक क्षेत्रातील एलआयसीचे अधिकारी आशुतोष प्रसाद, टपाल खात्याचे संजय फडके, गुंतवणूक सल्लागार मुकेश चोथाणी, विकास अमृतकर, भास्कर कोठावदे, संजय कुलकर्णी, नितीन अहेर उपस्थित होते.
प्रसाद यांनी एलआयसीची माहिती देताना सांगितले की, एखाद्या छोट्या देशातील लोकसंख्येइतक्या लोकांचा विमा काढणे ही साधी गोष्ट नाही. एलआयसीने आजपर्यंत ४० कोटी नागरिकांचा विमा उतरवला आहे. अनेक वर्षांपासून भारतीयांच्या सेवेत असणार्या एलआसीचे क्लेमचे प्रमाणही ९९ टक्क्यांच्या पुढे असल्याचे ते म्हणाले. एलआयसीच्या १५ प्रकारच्या योजनाही त्यांनी सांगितल्या. त्यानंतर टपाल खात्याच्या योजना सांगताना संजय फडके यांनी पोस्टाच्या योजना आणि त्याचा मध्यमवर्गीयांना होणारा लाभ याविषयी माहिती दिली. मध्यकाळासह लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीतून मिळणारा फायदाही त्यांनी सांगितला. गुंवणूक सल्लागार मुकेश चोथाणी यांनी गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी आणि गुंतवणुकीचे नवे मार्ग यावर मार्गदर्शन केले. याशिवाय विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना गुंतवणुकीसाठी घ्यावयाची काळजी यावर मनोगत व्यक्त केला. प्रवीण अमृतकर यांनी सूत्रसंचालन, तर स्वप्नील येवले यांनी आभार मानले.
छाया क्रमांक : १२५ : नाशिक युथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आशुतोष प्रसाद. समवेत संजय फडके, मुकेश चोथाणी, विकास अमृतकर, भास्कर कोठावदे, संजय कुलकर्णी, नितीन अहेर आदि.