शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...अन् पोलिसांनी हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना केली मारहाण; प्रियंका गांधींनी शेअर केला 'तो' Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 10:07 IST

पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करत त्यांना रेल्वे ट्रॅकवरून हटवलं आणि पुढील कारवाई करण्यात आली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नोकरी न मिळाल्याने योगी सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत. सलोरी भागातील प्रयाग स्थानकाच्या रेल्वे ट्रॅकवर उतरून विद्यार्थ्यांनी ट्रॅकवरच तळ ठोकला आणि बराच वेळ आंदोलन सुरूच ठेवलं. त्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करत त्यांना रेल्वे ट्रॅकवरून हटवलं आणि पुढील कारवाई करण्यात आली. यासंदर्भातले काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात पोलीस हॉस्टेलमध्ये घुसून आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढत आहेत, ज्यांनी रस्त्यावर गोंधळ निर्माण केला. 

काही पोलीस बंदुकीच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसले, तर काही जण लाथा मारून दरवाजा तोडत होते. परिसरात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा शोध घेत असल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे. मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडीओ नंतर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी योगी सरकारला घेरलं आहे. विद्यार्थ्यांवर होणारा हा अत्याचारा त्वरीत थांबवला गेला पाहीजे अशी मागणी केली आहे. तसेच भाजपावर देखील यावरून जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. 

"विद्यार्थ्यांच्या लॉज, हॉस्टेलची तोडफोड आणि मारहाण करणे हे अत्यंत निषेधार्ह"

प्रियंका गांधी यांनीही ट्विट करून या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांन याबाबतचे काही व्हिडीओ हे शेअर केले आहेत. "प्रयागराजमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या लॉज आणि हॉस्टेलची तोडफोड करणे आणि त्यांना मारहाण करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. प्रशासनाने ही जाचक कारवाई त्वरित थांबवावी. तरुणांना रोजगाराबाबत बोलण्याचा पूर्ण अधिकार असून या लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केली

हे आंदोलन NTPC च्या निकालाबाबत म्हणजेच RRB (रेल्वे भर्ती बोर्ड) मधील नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरती संदर्भात केले जात आहे. मंडळाने शेवटच्या क्षणी नियमात बदल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांनाच सेवेत घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मते, प्रत्यक्षात हा आकडा 20 टक्के असायला हवा होता. आता ती मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केली, ट्रॅकला घेराव घालण्यात आला आणि बराचवेळ गोंधळ घातला गेला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसPriyanka Gandhiप्रियंका गांधी