शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा’’, जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदाराला दिला असा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:24 IST

Prayagraj Mahakumbh 2025: प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना सनातनबाबतची पचनशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला.  

संसदचेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या साकव्या दिवशी राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळा प्रयागराजच्या महागड्या विमान तिकीटांचा मुद्दा गाजला. प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना सनातनबाबतची पचनशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला.  

त्याचं झालं असं की, प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांचा प्रश्न उपस्थित करत सांगितलं की, दिल्लीपासून लंडनसाठीचं विमान भाडं वेळीच तिकीट खरेदी केल्यास २४ हजार रुपये आहे. मात्र सध्या चेन्नईवरून प्रयागराजला जाण्यासाठी ५३ हजार रुपये भाडं आहे. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सध्या प्रयागराजचं महत्त्व असल्यानं भाडं जास्त असल्याचं सांगितलं. तेव्हा प्रमोद तिवारी यांनी कोलकाता, दिल्ली, हैदराबाद येथून प्रयागराजसाठीच्या विमान तिकिटाचे दर वाचून सांगितले. 

यावर सभापतींनी तुम्ही प्रीमियम तिकिटाचे दर सांगत आहात का? असं विचारलं तेव्हा प्रमोद तिवारी यांनी मी इकॉनॉमी तिकिटांबाबतच बोलत आहे, असे सांगितले. त्यावर जगदीप धनखड यांनी नेहमी असं होत नाही, असं सांगितलं. तेवव्हा प्रमोद तिवारी यांनी उत्तरदाखल सांगितलं की महाकुंभमुळे दर वाढलेले आहेत.  तेव्हा सभापती म्हणाले की, तो तर १४४ वर्षांनंतर आला आहे.

प्रमोद तिवारी संतापून म्हणाले की, महाकुंभच्या नावावर जनतेच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. हे सरकार आस्था आणि सनातनवर विश्वास ठेवते की... असे विचारत सरकार विमानाच्या दरांना सब्सिडाइज करणार का किंवा अधिकाधिक नेहमीपेक्षा दुप्पट तिकिटांच्या दराबाबत विचार करणार का? असा प्रश्न विचारला.  त्यावर सभापती जगदीप धनखड यांनी प्रमोद तिवारी यांना विचारलं की, तुम्ही प्रयागराजमधीलच रहिवासी आहात ना? तेव्हा तिवारी यांनी हो असं  उत्तर दिलं. त्यानंतर जगदीप धनखड  यांनी, सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा असा सल्ला प्रमोद तिवारी यांना दिला. तसेच मंत्री राममोहन नायडू यांना प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास सांगितलं. 

प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राममोहन नायडू यांनी सांगितले की, विमानांच्या तिकिटाचे दर हे मागणीवर अवलंबून असतात.  सध्या प्रयागराज हे लंडनपेक्षा महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला प्रयागराज येथे जायंच आहे. १४४ वर्षांनंतर आलेला हा उत्सव केवळ  हिंदूंसाठी नाही तर जगभरासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना प्रयागराज येथे जायचं आहे.  

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडKumbh Melaकुंभ मेळाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस