शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

"सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा’’, जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदाराला दिला असा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:24 IST

Prayagraj Mahakumbh 2025: प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना सनातनबाबतची पचनशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला.  

संसदचेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या साकव्या दिवशी राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळा प्रयागराजच्या महागड्या विमान तिकीटांचा मुद्दा गाजला. प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना सनातनबाबतची पचनशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला.  

त्याचं झालं असं की, प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांचा प्रश्न उपस्थित करत सांगितलं की, दिल्लीपासून लंडनसाठीचं विमान भाडं वेळीच तिकीट खरेदी केल्यास २४ हजार रुपये आहे. मात्र सध्या चेन्नईवरून प्रयागराजला जाण्यासाठी ५३ हजार रुपये भाडं आहे. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सध्या प्रयागराजचं महत्त्व असल्यानं भाडं जास्त असल्याचं सांगितलं. तेव्हा प्रमोद तिवारी यांनी कोलकाता, दिल्ली, हैदराबाद येथून प्रयागराजसाठीच्या विमान तिकिटाचे दर वाचून सांगितले. 

यावर सभापतींनी तुम्ही प्रीमियम तिकिटाचे दर सांगत आहात का? असं विचारलं तेव्हा प्रमोद तिवारी यांनी मी इकॉनॉमी तिकिटांबाबतच बोलत आहे, असे सांगितले. त्यावर जगदीप धनखड यांनी नेहमी असं होत नाही, असं सांगितलं. तेवव्हा प्रमोद तिवारी यांनी उत्तरदाखल सांगितलं की महाकुंभमुळे दर वाढलेले आहेत.  तेव्हा सभापती म्हणाले की, तो तर १४४ वर्षांनंतर आला आहे.

प्रमोद तिवारी संतापून म्हणाले की, महाकुंभच्या नावावर जनतेच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. हे सरकार आस्था आणि सनातनवर विश्वास ठेवते की... असे विचारत सरकार विमानाच्या दरांना सब्सिडाइज करणार का किंवा अधिकाधिक नेहमीपेक्षा दुप्पट तिकिटांच्या दराबाबत विचार करणार का? असा प्रश्न विचारला.  त्यावर सभापती जगदीप धनखड यांनी प्रमोद तिवारी यांना विचारलं की, तुम्ही प्रयागराजमधीलच रहिवासी आहात ना? तेव्हा तिवारी यांनी हो असं  उत्तर दिलं. त्यानंतर जगदीप धनखड  यांनी, सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा असा सल्ला प्रमोद तिवारी यांना दिला. तसेच मंत्री राममोहन नायडू यांना प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास सांगितलं. 

प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राममोहन नायडू यांनी सांगितले की, विमानांच्या तिकिटाचे दर हे मागणीवर अवलंबून असतात.  सध्या प्रयागराज हे लंडनपेक्षा महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला प्रयागराज येथे जायंच आहे. १४४ वर्षांनंतर आलेला हा उत्सव केवळ  हिंदूंसाठी नाही तर जगभरासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना प्रयागराज येथे जायचं आहे.  

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडKumbh Melaकुंभ मेळाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस