शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा’’, जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदाराला दिला असा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:24 IST

Prayagraj Mahakumbh 2025: प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना सनातनबाबतची पचनशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला.  

संसदचेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या साकव्या दिवशी राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळा प्रयागराजच्या महागड्या विमान तिकीटांचा मुद्दा गाजला. प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना सनातनबाबतची पचनशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला.  

त्याचं झालं असं की, प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांचा प्रश्न उपस्थित करत सांगितलं की, दिल्लीपासून लंडनसाठीचं विमान भाडं वेळीच तिकीट खरेदी केल्यास २४ हजार रुपये आहे. मात्र सध्या चेन्नईवरून प्रयागराजला जाण्यासाठी ५३ हजार रुपये भाडं आहे. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सध्या प्रयागराजचं महत्त्व असल्यानं भाडं जास्त असल्याचं सांगितलं. तेव्हा प्रमोद तिवारी यांनी कोलकाता, दिल्ली, हैदराबाद येथून प्रयागराजसाठीच्या विमान तिकिटाचे दर वाचून सांगितले. 

यावर सभापतींनी तुम्ही प्रीमियम तिकिटाचे दर सांगत आहात का? असं विचारलं तेव्हा प्रमोद तिवारी यांनी मी इकॉनॉमी तिकिटांबाबतच बोलत आहे, असे सांगितले. त्यावर जगदीप धनखड यांनी नेहमी असं होत नाही, असं सांगितलं. तेवव्हा प्रमोद तिवारी यांनी उत्तरदाखल सांगितलं की महाकुंभमुळे दर वाढलेले आहेत.  तेव्हा सभापती म्हणाले की, तो तर १४४ वर्षांनंतर आला आहे.

प्रमोद तिवारी संतापून म्हणाले की, महाकुंभच्या नावावर जनतेच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. हे सरकार आस्था आणि सनातनवर विश्वास ठेवते की... असे विचारत सरकार विमानाच्या दरांना सब्सिडाइज करणार का किंवा अधिकाधिक नेहमीपेक्षा दुप्पट तिकिटांच्या दराबाबत विचार करणार का? असा प्रश्न विचारला.  त्यावर सभापती जगदीप धनखड यांनी प्रमोद तिवारी यांना विचारलं की, तुम्ही प्रयागराजमधीलच रहिवासी आहात ना? तेव्हा तिवारी यांनी हो असं  उत्तर दिलं. त्यानंतर जगदीप धनखड  यांनी, सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा असा सल्ला प्रमोद तिवारी यांना दिला. तसेच मंत्री राममोहन नायडू यांना प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास सांगितलं. 

प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राममोहन नायडू यांनी सांगितले की, विमानांच्या तिकिटाचे दर हे मागणीवर अवलंबून असतात.  सध्या प्रयागराज हे लंडनपेक्षा महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला प्रयागराज येथे जायंच आहे. १४४ वर्षांनंतर आलेला हा उत्सव केवळ  हिंदूंसाठी नाही तर जगभरासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना प्रयागराज येथे जायचं आहे.  

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडKumbh Melaकुंभ मेळाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस