शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

केवळ आश्वासनं, मदत नाही; अनाथ मुलांसाठी सरकारनं केलेल्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 20:07 IST

अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यावरून प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा.

ठळक मुद्देअनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.यावरून प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर किंचित कमी होताना पाहायला मिळत आहे. देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना पाहायला मिळत असली, तरी मृत्यूंचे वाढलेले प्रमाण चिंतेत भर टाकणारे ठरत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे अनेक मुलांवरून आई-वडिलांचे छत्र हरपलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यावरून निवडणूक रणनितिकार प्रशांत किशोर यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. सरकार केवळ आश्वासनं देतं. परंतु मदत देण्याच्या वेळी अयशस्वी ठरतं असल्याचं प्रशांत किशोर म्हणाले. "मोदी सरकराचा आणखी एक मास्टरस्ट्रोक. यावेळी कोविज आणि त्याच्या खराब व्यवस्थापनामुळे फटका बसलेल्या मुलांसाठी सहानुभूती आणि देखभालीची परिभाषा व्याख्या तयार केली जात आहे. अशा वेळी जेव्हा मुलांना अधिक मदतीची आवश्यकता असते, तेव्हा त्यांना वयाच्या १८ व्या वर्षी वेतनाचे आश्वासन दिलं, त्याबद्दल त्यांना सकारात्मक वाटलं पाहिजे का?," असा सवाल प्रशांत किशोर यांनी केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. "पंतप्रधान कार्यालयाला आपण धन्यवाद केलं पाहिजे जे आम्हाला आयुष्यमान भारतच्या योजनांमध्ये नामांकित करतात. जेणेकरून ५० कोटी भारतीयांच्या आरोग्यासंबंधीच्या गरजांना पूर्ण केलं जाऊ शकेल. परंतु गरज भासल्यावर ऑक्सिजन आणि बेड देण्यातही ते अयशस्वी ठरतात," असंही त्यांनी नमूद केलं. 

सरकारनं जाहीर केली होती मदतज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा सांभाळकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत, अशा सर्व मुलांना १८ वर्षांचे झाल्यानंतर स्टायपेंड म्हणजे निश्चित रक्कम देण्यात येईल. तसंच ही मुलं २३ वर्षांची झाल्यानंतर पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपये दिले जातील, असं पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय या सर्व मुलांना आयुषमान योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा विमा मोफत उपलब्ध करून दिला जाणार असून, १८ वर्षांपर्यंत याचे सर्व हप्ते पीएम केअर्स फंडातून भरले जातील, असंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच दोन्ही पालकांचं छत्र हरवल्यामुळे जी मुलं अनाथ झाली आहेत. त्यांना मोफत शिक्षण दिलं जाणार असून, उच्च शिक्षणासाठी पीएम केअर्स फंडातून मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षणासाठी लागणाऱ्या कर्जाचे हप्ते पीएम केअर्स फंडातून भरले जातील, असंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीPrashant Kishoreप्रशांत किशोरIndiaभारतTwitterट्विटर