शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:10 IST

संजय सिंह यांची मोदी सरकार व रा.स्व. संघावर टीका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी या घोषणेचे स्वागत केले. मात्र आम आदमी पार्टी (आप) नेता, खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)वर टीका केली. मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केल्याने त्यांना भारतरत्न देण्यात आले, असे सिंह यांनी म्हटले आहे.सिंह यांनी ‘ट्विट’केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नेताजी सुभाषचन्द्र बोस, शहीदे आजम भगत सिंह, डॉ. राम मनोहर लोहिया,स्व. ध्यानचंद यांना आजपर्यंत भारतरत्न मिळाले नाही. नानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणि ‘आप’च्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मुद्दा पुढे नेणारे संघ प्रशंसक प्रणव मुखर्जी यांना मात्र भारतरत्न देण्यात आले. संजय सिंह यांनी म्हटले आहे की, भाजपाची भारतरत्न योजना म्हणजे एकदा संघ शाखेत जा, आणि भारतरत्न बना, अशा छापाची आहे. भारतरत्न किताबाची त्यामुळे टिंगल झाली आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी एकाच वेळी तीन भारतरत्न देण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे प्रणब मुखर्जी यांची निवड चकित करणारी आहे. ते राष्ट्रपती असताना त्यांचा सरकारशी चांगला समन्वय होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य प्रमुख लोकांशीही व्यक्तिगत संबंध चांगले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने प्रणब मुखर्जी यांच्या विरोधात मतदान केले होते. मात्र मुखर्जी यांनी पदाच्या प्रतिष्ठेची जाणीव जाहीरपणे करून दिली.मुखर्जी यांनी मानले आभारमुखर्जी यांनी भारतरत्नपदी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या सन्मानासाठी मी समस्त देशवासीयांबद्दल विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करतो,असे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रणब मुखर्जी यांचे फोनवरुन संपर्क साधत अभिनंदन केले आहे. तसेच ‘ट्विट’ही केले आहे. प्रणवदा आमच्या काळातील उत्तम राजनेते आहेत. अनेक दशके त्यांनी देशाची निस्वार्थ सेवा केली. अथक परिश्रम केले. त्यामुळे देशाच्या विकासाची खास छाप पडली आहे.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ