शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:10 IST

संजय सिंह यांची मोदी सरकार व रा.स्व. संघावर टीका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी या घोषणेचे स्वागत केले. मात्र आम आदमी पार्टी (आप) नेता, खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)वर टीका केली. मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केल्याने त्यांना भारतरत्न देण्यात आले, असे सिंह यांनी म्हटले आहे.सिंह यांनी ‘ट्विट’केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नेताजी सुभाषचन्द्र बोस, शहीदे आजम भगत सिंह, डॉ. राम मनोहर लोहिया,स्व. ध्यानचंद यांना आजपर्यंत भारतरत्न मिळाले नाही. नानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणि ‘आप’च्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मुद्दा पुढे नेणारे संघ प्रशंसक प्रणव मुखर्जी यांना मात्र भारतरत्न देण्यात आले. संजय सिंह यांनी म्हटले आहे की, भाजपाची भारतरत्न योजना म्हणजे एकदा संघ शाखेत जा, आणि भारतरत्न बना, अशा छापाची आहे. भारतरत्न किताबाची त्यामुळे टिंगल झाली आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी एकाच वेळी तीन भारतरत्न देण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे प्रणब मुखर्जी यांची निवड चकित करणारी आहे. ते राष्ट्रपती असताना त्यांचा सरकारशी चांगला समन्वय होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य प्रमुख लोकांशीही व्यक्तिगत संबंध चांगले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने प्रणब मुखर्जी यांच्या विरोधात मतदान केले होते. मात्र मुखर्जी यांनी पदाच्या प्रतिष्ठेची जाणीव जाहीरपणे करून दिली.मुखर्जी यांनी मानले आभारमुखर्जी यांनी भारतरत्नपदी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या सन्मानासाठी मी समस्त देशवासीयांबद्दल विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करतो,असे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रणब मुखर्जी यांचे फोनवरुन संपर्क साधत अभिनंदन केले आहे. तसेच ‘ट्विट’ही केले आहे. प्रणवदा आमच्या काळातील उत्तम राजनेते आहेत. अनेक दशके त्यांनी देशाची निस्वार्थ सेवा केली. अथक परिश्रम केले. त्यामुळे देशाच्या विकासाची खास छाप पडली आहे.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ