शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
अरे देवा! भांडी घासताना काचेच्या ग्लासमध्ये अडकला हात, सर्जरीनंतरच झाली सुटका
7
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
8
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
9
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
10
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

प्रज्ञा सिंह यांनी भाजपाच्या नोटिशीला दिलं उत्तर, मोदींना भेटण्याची व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 12:41 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उत्तरामध्ये आपण आता पक्षशिस्त पाळणार असल्याचं म्हटलं आहे. संधी मिळाली तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आवडेल. भोपाळमध्ये असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपावर मोठ्याप्रमाणात टीका होत असल्याने भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकूर यांना नोटीस पाठवत खुलासा मागितला होता. लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा ठाकूर भोपाळमधून निवडून आल्या आहे. प्रचार दरम्यान त्यांनी गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपाने 17 मे रोजी त्यांना नोटीस पाठवत 10 दिवसांच्या आत उत्तर मागितले होते. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह यांनी भाजपाच्या नोटिशीला उत्तर पाठवलं आहे. 

भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उत्तरामध्ये आपण आता पक्षशिस्त पाळणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच यापुढे आपला कारभार हा पक्षशिस्तीला अनुसरूनच असल्याचं सांगितलं आहे. तसेच  मी पक्षाची शिस्तबद्ध सदस्य असून पक्ष संघटनेत शिस्त असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केलं. संधी मिळाली तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आवडेल. भोपाळमध्ये असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं आहे. 

प्रज्ञा सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा केला होता. 'त्या' विधानावरून भाजपाने हात वर केले होते. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं सांगितलं होतं. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली होती. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रज्ञा सिंह यांनी माफी मागत 21 तास मौन व्रत करणार असल्याचं म्हटलं होतं.  

नथुराम गोडसेच्या विधानावरून प्रज्ञा सिंह यांनी 'हे माझं वैयक्तिक मत आहे. मी रोड शोमध्ये होते त्यावेळी जाताना मी हे उत्तर दिलं आहे. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे' असं म्हटलं होतं. 'प्रज्ञा सिंह यांच्या त्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच प्रज्ञा सिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून, त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी' असं भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं होतं. दरम्यान, प्रज्ञा सिंह यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता. त्यावेळीही त्यांना त्या विधानावरून विरोधकांनी धारेवर धरलं होतं. 

 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाbhopal-pcभोपाळBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी