शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

विवाहित पती-पत्नींना मोदी सरकार देणार ५१ हजार रुपये, करावं लागेल केवळ हे काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 11:21 IST

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana : या योजनेत तुमची गुंतवणूक ही १० वर्षांसाठी असते. १० वर्षांपर्यंत तुम्हाला वार्षिक किंवा मासिक पेन्शन दिली जाते. जर तुम्ही १० वर्षे या योजनेत कायम राहिलात तर तुम्हाला तुमची गुंतवणूक परत केली जाते. तसेच तुम्ही ही योजना कधीही सरेंडर करू शकता.  

नवी दिल्ली -  केंद्र सरकारने पंतप्रधान वय वंदना योजना सुरू केली आहे. या योजनेमधून लाभार्थ्यांना पेन्शनची हमी देत आहेत. ही योजना केंद्र सरकारने २६ मे २०२० रोजी सुरू केली होती. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करू शकता. पती पत्नी दोघेही ६० वर्षे झाल्यानंतर या योजनेतून पेन्शन घेऊ शकतात.

पंतप्रधान वय वंदना योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. त्याअंतर्गत अर्जदाराला वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. ही योजना भारत सरकारने आणली आहे. ही योजना एलआयसीकडून चालवली जाते. ज्या व्यक्तींचं वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशाच व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेत कमाल १५ लाख रुपये गुंतवता येतात. आधी या योजनेत केवळ ७.५ लाख रुपये गुंतवता येत होते. मात्र आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळते.  

जर पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ मिळवू इच्छित असतील तर त्यांना प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये सुमारे प्रत्येकी ३ लाख ७ हजार ५०० रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच एकूण ६ लाख १५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेवर एकूण ७.४० टक्के व्याज दिले जाते. त्या हिशेबाने वर्षाची पेन्शन ही ५१ हजार ४५ रुपये एवढी होते. जर तुम्हाला दरमहा पेन्शन हवी असेल तर ४१०० रुपये पेन्शनच्या रूपात मिळेल.

या योजनेत तुमची गुंतवणूक ही १० वर्षांसाठी असते. १० वर्षांपर्यंत तुम्हाला वार्षिक किंवा मासिक पेन्शन दिली जाते. जर तुम्ही १० वर्षे या योजनेत कायम राहिलात तर तुम्हाला तुमची गुंतवणूक परत केली जाते. तसेच तुम्ही ही योजना कधीही सरेंडर करू शकता.  

टॅग्स :MONEYपैसाLIC - Life Insurance CorporationएलआयसीCentral Governmentकेंद्र सरकारFamilyपरिवार