शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोर्टाचे अधिकार काढता येणार नाहीत; अवमान हक्कप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 06:21 IST

न्यायालयाचे अवमान अधिकार विधिमंडळात कायदे करूनदेखील काढून घेतले जाऊ शकत नाहीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.

ठळक मुद्देन्यायालयाचे अवमान अधिकार विधिमंडळात कायदे करूनदेखील काढून घेतले जाऊ शकत नाहीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.

नवी दिल्ली : न्यायालयाचे अवमान अधिकार विधिमंडळात कायदे करूनदेखील काढून घेतले जाऊ शकत नाहीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. न्यायालयावर दोषारोप करून धमकावल्याबद्दल २५ लाख रुपये जमा न करून अवमान केल्याप्रकरणी स्वयंसेवी संघटनेच्या (एनजीओ) अध्यक्षाला न्यायालयाने दोषी ठरवले. अवमान करणारा न्यायालयाच्या अवमानात स्पष्टपणे दोषी असल्याचे आणि न्यायालयावर दोषारोप करण्याच्या त्याच्या कृत्याला उत्तेजन दिले जाऊ शकत नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे, असे न्यायालयाने म्हटले.

न्यायमूर्ती एस. के. कौल आणि एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने म्हटले की, एनजीओ सुराझ इंडिया ट्रस्टचे अध्यक्ष राजीव दैया हे न्यायालयासह प्रशासकीय कर्मचारी आणि राज्य सरकार अशा प्रत्येकावर चिखल उडवत आले आहेत. अवमानासाठी शिक्षा करण्याचा अधिकार हा या न्यायालयाला घटनात्मक असून तो कायदा करूनदेखील काढून घेतला जाऊ शकत नाही.

न्यायालयाने दैया यांना नोटीस देऊन ७ ऑक्टोबर रोजी सुनावली जाणारी शिक्षा ऐकण्यास हजर राहण्याचा आदेश दिला. न्यायालयावर दोषारोप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये आणि शिक्षा का देऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने दैया यांना बजावली होती. दैया यांनी खंडपीठाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला दंड भरण्यास माझ्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत आणि मी देशाच्या राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करीन. दैया यांनी अनेक वर्षे ६४ सार्वजनिक हित याचिका दाखल केल्या. त्यांना त्यात यश आले नाही.

२०१७ मध्ये ठोठावला होता २५ लाखांचा दंड सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा वारंवार दुरुपयोग केल्याबद्दल २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २५ लाख रुपये दंड ठोठावला होता. हा निकाल मागे घेण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या दैया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतCourtन्यायालय