शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

अनेक पक्षांमुळे मतांच्या फाटाफुटीवरच ठरणार पंजाबमधील सत्तेचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:35 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने फारशी अपेक्षा न ठेवलेले आणि काँगे्रसला अच्छे दिन दाखवणारे राज्य म्हणून पंजाबकडे पाहिले जाते.

- मनीषा मिठबावकरयंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने फारशी अपेक्षा न ठेवलेले आणि काँगे्रसला अच्छे दिन दाखवणारे राज्य म्हणून पंजाबकडे पाहिले जाते. काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या दोन तुल्यबळ पक्षांसोबतच वेगवेगळ्या आघाड्या आणि ‘आप’सह अन्य छोट्या पक्षांनी शड्डू ठोकल्याने मतांची किती फाटाफूट होते, यावरच तेथील निवडणूक निकाल अवलंबून असतील.आम आदमी पक्षाने सर्व १३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. अकाली दलातील बंडखोर नेत्यांचा अकाली दल (टाकसाली) आणि ‘आप’ला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांची पंजाबी एकता पार्टीही रिंगणात आहे. टाकसालींच्या दलाने बसपा, आपतर्फे निवडून आलेले व आपमध्ये सध्या नसलेल्या खा. डॉ. धरमवीर गांधींच्या गटाशी आघाडी केली आहे. पंजाबी एकता पार्टीलाही या आघाडीत असेल. पंजाब डेमॉक्रेटि अलायन्स असे तिचे नाव आहे.पंजाबने २००९ मध्ये काँग्रेसला कौल दिला. तेव्हा काँग्रेसला आठ, अकाली दलाला चार, तर भाजपाला एक जागा मिळाली. पण २०१४ साली चित्र पालटले. अकाली दलाला चार, भाजपाला दोन, तर काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत पहिल्यांदाच पंजाबच्या राजकारणात आपने प्रवेश करून चार जागा मिळवत प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभे केले.पुढे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आप राज्यात बस्तान बसवेल, असे वाटत होते. मात्र, विधानसभेला जनमताचा लंबक काँग्रेसच्या बाजूने झुकला. काँग्रेसने ११७ पैकी ७७ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आणि दहा वर्षांनंतर राज्यात काँग्रेस सत्तेवर आली. कॅप्टन अमरिंदर सिंग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. भाजपा-अकाली दलाच्या प्रकाशसिंग बादल सरकारचे राज्य खालसा झाले.पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसने मोठा विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या ३५३ पैकी ३३१ जागा जिंकल्या. अकाली दलाला १८ व भाजपाला दोनच जागा मिळाल्या. आपला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे काँग्रेसची स्थिती मजबूत आहे.लोकसभा निवडणुकीत अकाली दल, भाजपा एकत्र लढतील. भाजपा येथे अकाली दलाच्या लहान भावाच्या भूमिकेत आहे. सध्या अकाली दलाला फुटीचे ग्रहण लागले आहे. खासदार रणजीतसिंग ब्रह्मपुरा, माजी मंत्री रतन सिंग अजनाला, माजी मंत्री सेवासिंग सेखवा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी प्रकाशसिंग बादल व माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल या पिता-पुत्रांविरोधात मोर्चा उघडून, शिरोमणी अकाली दल (टकसाली) या पक्षाची स्थापना केली. त्याचवेळी काँग्रेसचे माजी आमदार जोगिंदरसिंग पंजगराई हे समर्थकांसह अकाली दलात सामील झाले आहेत.‘आप’मध्ये ना‘राजीनामा’ नाट्य रंगले आहे. आमदार एच. एस. फुलका यांनी राजीनामा दिला आहे. बंडखोर आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी पंजाबी एकता पार्टी स्थापन केली आहे. आमदार मास्टर बलदेव सिंग यांनीही खैरा यांच्याशी हातमिळवणी केली आहे, तर टाकसालीने बसपा, डॉ. धरमवीर गांधी यांच्या गटासोबत आघाडी केली आहे. मतांच्या विभाजनासाठी हे राजकीय उद्योग सुरू असल्याने त्याचा फायदा काँग्रेस उठवण्याची शक्यता आहे.मते वळवण्याचे आव्हानमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चांगल्या स्थितीत आहे. पण अकाली दलाला बंडखोर नेते रणजित सिंग ब्रह्मपुरा, निलंबित केलेले शेरसिंग घुबाया यांना सशक्त पर्याय शोधावा लागेल. घुबाया यांचा शीख समाजावर मोठा प्रभाव आहे. हा प्रभाव तसेच अकाली दल (टाकसाली) या नव्या पक्षामुळे विभागली जाणारी मते आपल्याकडे वळवणे हेच अकाली दलापुढे आव्हान आहे.असे आहेतप्रचाराचे प्रमुख मुद्देधार्मिक ग्रंथ अवमान प्रकरण, पाणी प्रश्न, अमली पदार्थांचे वाढते जाळे, विकास, शेतकºयांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार इत्यादी.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारण