शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’चा अभ्यासक्रम कमी करण्याची शक्यता; पुढील आठवड्यातील बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 23:28 IST

आयआयटी संस्थांत प्रवेश मिळण्यासाठी जेईई परीक्षा घेतली जाते. कोविड-१९ साथीमुळे ही परीक्षा कशी घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणू साथीमुळे सर्व शैक्षणिक घडामोडी बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर २0२0 च्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करण्याचा, तसेच परीक्षा पद्धती बदलण्याचा विचार सुरू असून, ‘इंडियन इन्स्टिट्यूटस् आॅफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) संस्था यावर चर्चा करणार आहेत.आयआयटी संस्थांत प्रवेश मिळण्यासाठी जेईई परीक्षा घेतली जाते. कोविड-१९ साथीमुळे ही परीक्षा कशी घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. आयआयटी संस्थांच्या ‘संयुक्त प्रवेश मंडळा’च्या (जेएबी) आढावा बैठकीत हा मुद्दा विचारार्थ येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील आठवड्यात ही बैठक होणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. इतरही काही मुद्दे बैठकीत चर्चिले जाणार आहेत.यंदाची जेईई अ‍ॅडव्हान्स आयआयटी-दिल्ली घेणार आहे. आयआयटी-दिल्लीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील आठवड्यात ‘जेएबी’ची आढावा बैठक होत आहे. या बैठकीत जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा होईल. परीक्षेची पद्धती, अभ्यासक्रम यासंदर्भातील प्रस्ताव बैठकीत चर्चिले जातील. ‘जेएबी’ने मंजुरी दिल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. जेईई परीक्षेला बसण्यासाठी उमेदवार शालेय बोर्डाची १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट यंदा शिथिल केली जाण्याचीही शक्यता आहे.कोविड-१९ साथीमुळे सीबीएसई आणि सीआयएससीई यासह देशभरातील विविध बोर्डांनी यंदा आपल्या परीक्षा रद्द केल्या आहेत.परीक्षा रद्द झाल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे द्यायचे यासंबंधी विविध बोर्डांकडून वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांवर विचार केला जात आहे. प्रत्येक बोर्डाचा फॉर्म्युला भिन्न असेल, तर विद्यार्थ्यांच्या गुणांत समानता असणार नाही. त्यामुळे जेईईसाठी ते कसे ग्राह्य धरायचे ही एक मोठीच समस्या बनणार आहे.एनटीएकडून अधिकृत दुजोरा नाही- स्थापित नियमानुसार, आयआयटी संस्थांत प्रवेशासाठी १२ वीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण अथवा टॉप २0 पर्सेंटाईल असणे आवश्यक आहे. सीबीएसईने आपल्या अभ्यासक्रमात ३0 टक्के कपात केली आहे. याचा नीट (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) आणि जेईई यांच्यावर गंभीर परिणाम होईल, असे मानले जात आहे. कारण प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमावरच आधारलेला असतो.- सूत्रांनी सांगितले की, ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’साठी अभ्यासक्रम कमी केल्यास ‘जेईई मेन’चा अभ्यासक्रमही कमी होईल. शाळा योग्य वेळेत उघडल्या गेल्या नाहीत, तर जानेवारी २0२१ मधील जेईई मेन परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. परीक्षा घेणाºया ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडून (एनटीए) मात्र या वृत्तास कोणत्याही प्रकारे दुजोरा मिळू शकलेला नाही.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा