शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 20:21 IST

भाजपा नेत्या आश्विनी उपाध्याय यांनी हे पोस्टकार्ड अभियान सुरु केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी हा कायदा महत्वाचा असल्याचे उपाध्याय यांचे मत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली होती.

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे यंदा देशात २ कोटी बालके जन्माला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीच सव्वा कोटींहून अधिक असलेल्या लोकसंख्येमध्ये आणखी मोठी वाढ झाल्यास लोकसंख्या नियंत्रणाचे मोठे संकट देशासमोर उभे ठाकणार आहे. यामुळे देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पोस्ट कार्ड पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे. 

भाजपा नेत्या आश्विनी उपाध्याय यांनी हे पोस्टकार्ड अभियान सुरु केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी हा कायदा महत्वाचा असल्याचे उपाध्याय यांचे मत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली होती. यामुळे जनतेची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात येणार आहे.

यासाठी उपाध्याय यांनी लोकांना पंतप्रधान कार्यालयाला एक चिठ्ठी लिहिण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये हस्ताक्षरामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा, असे लिहिण्यास सांगितले आहे. तसेच ओळखीच्या, नातेवाईकांनाही असे करण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे. 

आश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की, एका कुटुंबामध्ये ५ सगस्य असतील तर २० कुटुंबांचे १०० सदस्य झाले. ५० पैशांना एक पोस्टकार्ड मिळते. शंभर पत्रे पाठविण्यासाठी ५० रुपयांचा खर्च येईल. जर एका व्यक्तीने १०० लोकांकडून पोस्ट कार्ड लिहून घेतले तर एक लाख लोक १ कोटी पत्रे पीएमओला पाठविण्यासाठी यशस्वी होतील. जेव्हा ही पत्रे पीएमओकडे जातील तेव्हा त्याची मोजणी होईल. जेव्हा ही पत्रे रोज १०००० एवढ्या संख्येने पोहोचतील तेव्हा पंतप्रधान कार्यालयात चर्चेचा विषय बनेल. ज्यामुळे मोदींपर्यंत ही मागणी पोहोचेल आणि कायदा बनविण्यासाठी विचार होईल असे उपाध्याय म्हणाले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली

महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन

अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण

नादखुळा...! वय वर्ष ५ अन् एसयुव्ही घेऊन खरेदी करायला निघाला लॅम्बॉर्गिनी

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी