शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:37 IST

'विविधतेत एकता’ ही भारताची आत्मा आहे. मात्र, जात, भाषा, प्रादेशिकता आणि अतिवादी विचारांनी प्रेरित विभाजनाचा सामना केला गेला नाही, तर देश कमकुवत होऊ शकतो,' अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

घुसखोरी आणि बाह्य शक्तींपेक्षाही मोठा धोका जनसांख्यिकी बदलाचा आहे. घुसखोरी आणि बाह्य शक्ती हे दीर्घकाळापासूनच देशाच्या एकतेसाठी आव्हान ठरले आहेत. मात्र, आज मोठे आव्हान आहे ते जनसांख्यिकी बदलाचे. कारण यामुळे सामाजिक समानता कमकुवत होत आहे. दसऱ्यापूर्वी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हा  इशारा दिला आहे. ते 1 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्ष समारोहात बोलत होते. 

'विविधतेत एकता’ ही भारताची आत्मा आहे. मात्र, जात, भाषा, प्रादेशिकता आणि अतिवादी विचारांनी प्रेरित विभाजनाचा सामना केला गेला नाही, तर देश कमकुवत होऊ शकतो,' अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मोदी म्हणाले, “सामाजिक समता म्हणजे वंचितांना प्राधान्य देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि राष्ट्रीय एकता वाढवणे. आज जनसांख्यिकी बदल, अतिवादी विचार, क्षेत्रवाद, जाती-भाषा वाद  आणि बाह्य शक्तींनी भडकावलेले विभाजन, अशी असंख्य आव्हाने  आपल्या समोर आहेतत.” विविधतेत एकता हा भारताचा मूलमंत्र आहे, तो तुटला तर राष्ट्राची ताकद कमी होईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी RSS च्या शताब्दी निमित्ताने स्मारक डाक तिकीट जारी केले. ते म्हणाले, “RSS नेहमीच समाजाच्या विविध घटकांना सोबत घेऊन काम करतो. मात्र, ‘राष्ट्र प्रथम’ या सिद्धांतामुळे त्याच्या विविध शाखांमध्ये कधीही अंतर्विरोध होत नाही. 1925 मध्ये केशव बळिराम हेडगेवार यांनी RSS ची स्थापना सांस्कृतिक जागृती, शिस्त, सेवा, सामाजिक उत्तरदायित्व वाढवण्यासाठी केली. 

मोदी म्हणाले, आरएसएस ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या विचारांवर विश्वास ठेऊन काम करते. स्वातंत्र्यानंतर संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न झाले, तरी तो राष्ट्राची अविरत सेवा करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Demographic change more dangerous than infiltration: PM Modi warns India.

Web Summary : PM Modi warned that demographic shifts pose a greater threat than infiltration, potentially weakening social equality and national unity. He highlighted challenges like extremism, regionalism, and caste divisions during an RSS event, emphasizing the importance of 'unity in diversity' for India's strength.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाprime ministerपंतप्रधान