शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अर्थसंकल्पापूर्वीच बिहारमध्ये राजकारण पेटले; टेकू देणाऱ्या नितिशकुमारांची 'विशेष दर्जा'ची मागणी मान्य नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 10:30 IST

Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला धक्का बसला आहे. विशेष राज्याचा दर्जा मिळण्यासाठी ज्या तरतुदी पूर्ण कराव्या लागतात, त्या बिहारमध्ये नाहीत, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट केले आहे.

Budget 2024 : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, काल पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून सरकारने सोमवारी २०१२ मध्ये तयार केलेल्या आंतर-मंत्रालयीन गटाच्या अहवालाचा हवाला देत बिहारला विशेष दर्जा देता येणार नाही, असे स्पष्ट केले. यामुळे बिहारमध्ये राजकारण पेटले आहे. यामुळे आता संसदेत अर्थसंकल्पाआधीच केंद्रातील राजकारण तापले आहे.  

अहवालानुसार, बिहारला विशेष दर्जा देता येणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, राष्ट्रीय विकास परिषदेने यापूर्वी काही राज्यांना विशेष श्रेणीचा दर्जा दिला होता. ज्या राज्यांना विशेष श्रेणीचा दर्जा दिला जाऊ शकतो त्यामध्ये डोंगराळ प्रदेश, लोकसंख्येची कमी घनता किंवा आदिवासी लोकसंख्येचे मोठे प्रमाण, आर्थिक आणि पायाभूत सुविधांचे मागासलेपण, इतर घटकांचा समावेश होतो. राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, विशेष राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी ज्या तरतुदी पूर्ण कराव्या लागतात त्या बिहारमध्ये नाहीत.

चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीने अर्थसंकल्पापूर्वी अर्थ मंत्रालयाला आपल्या ३ सर्वात मोठ्या मागण्या पाठवल्या होत्या. चंद्रबाबू यांनी अनंतपूर, चित्तूर, कडप्पा, कुरनूल, श्रीकाकुलम, विशाखापट्टणम आणि विजयनगरमसह राज्यातील इतर मागासलेल्या जिल्ह्यांसाठी अर्थसंकल्पीय अनुदान असावे. यानंतर दुसऱ्या अमरावतीसाठी आर्थिक मदत आणि तिसऱ्या पोलावरम पाटबंधारे प्रकल्पासाठी वेळेत पैसे देण्याची मागणी समाविष्ट आहे.

दरम्यान, टीडीपीचे सरचिटणीस आणि आंध्र प्रदेशचे मानव संसाधन विकास आणि आयटी मंत्री नारा लोकेश म्हणाले की, या मागण्यांमध्ये अनपेक्षित काहीही नाही, पण ते फक्त राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक आश्वासने पूर्ण करण्यासाठी आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष TDP विविध निधी आणि प्रकल्पांसाठी दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे.पण आंध्र प्रदेशसाठी विशेष दर्जा मिळविण्यासाठी दबाव न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मित्र पक्षांनी दबाव तंत्र वापरले

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार राज्याच्या विशेष राज्याच्या केलेल्या मागणीला केंद्राने उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे टीडीपीनेही मोठ्या योजनांची मागणी केल्याचे बोलले जात आहे, या योजनांसाठी त्यांनीही दबाव तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.   

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीBudgetअर्थसंकल्प 2024Nitish Kumarनितीश कुमार