शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

कृषी कायद्यांवरून पेटले राजकारण, प्रकाश सिंग बादल यांना परत केला 'पद्मविभूषण'

By बाळकृष्ण परब | Updated: December 3, 2020 14:26 IST

Prakash Singh Badal News : केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचा निषेध म्हणून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मविभूषण हा पुरस्कार परत केला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबसह देशातील इतर भागांमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचा निषेध म्हणून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मविभूषण हा पुरस्कार परत केलाअकाली दलाचे सर्वेसर्वा असलेल्या प्रकाश सिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानी पत्र लिहून कृषी कायद्यांचा विरोध केला आहे

चंदिगड - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबसह देशातील इतर भागांमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करत दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांसोबत सरकारने चर्चेस सुरुवात केली आहे. मात्र या मुद्द्यावर अद्याप सकारात्मक तोडगा निघालेला नाही. दरम्यान, केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचा निषेध म्हणून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मविभूषण हा पुरस्कार परत केला आहे.अकाली दलाचे सर्वेसर्वा असलेल्या प्रकाश सिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानी पत्र लिहून कृषी कायद्यांचा विरोध केला आहे. तसेच शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. त्यासोबत बादल यांनी त्यांना देण्यात आलेला पद्मविभूषण सन्मान परत केला आहे.पद्मविभूषण पुरस्कार परत करताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल म्हणाले की, मी एवढा गरीब आहे की शेतकऱ्यांसाठी कु्र्बानकरण्यासाठी माझ्याकडे अन्य काही नाही आहे. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळे आहे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल तर कुठल्याही प्रकारचा सन्मान ठेवण्यामुळे मला काही फायदा होणार नाही. शेतकऱ्यांचा ज्या प्रकारे विश्वासघात करण्यात आला आहे, त्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्याप्रकारे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत आहे, ती बाब खूप वेदनादायी आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliticsराजकारणPunjabपंजाब