शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:29 IST

Bihar Assembly Election 2020 : लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला.

-  एस. पी. सिन्हा 

फोर्बेस्गंज : मागील दशक हे बिहारमधील आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी होते. मात्र, २०२१ - २०३० हे दशक राज्यातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला. येथे एका प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले की, जंगल राज चालविणाऱ्यांनी एकेकाळी मतदान केंद्रांवर कब्जा करुन गरिबांचा मताधिकार हिसकावून घेतला. पण, रालोआने त्यांना मतदानाचा अधिकार परत दिला.  बिहारमधील नागरिक आता त्या लोकांना ओळखून चुकले आहेत ज्यांच एकमेव स्वप्न होते की, लोकांना घाबरवून, अफवा पसरवून, फूट पाडून सत्ता हस्तगत करणे. पण, बिहारचे लोक जाणतात की, कोण बिहारच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राजदचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा उल्लेख न करता ते म्हणाले की, लोकांनी जंगलराजच्या डबल डबल युवराजांना नाकारले आहे. गत दशकात प्रत्येक घरात वीज पोहचली. आता आगामी दशकात बिहार चमकून उठेल. गत दशकात घरोघरी गॅस कनेक्शन पोहचले.

मोदी, नितीशकुमार यांनी बिहारला लुटले : राहुल गांधी कटिहार : कोरोना, बेरोजगारीची समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात केंद्र व बिहार सरकारला अपयश आले आहे, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कटिहारमधील सभेत अशी टीका केली की, मोदी आणि नितीशकुमार यांनी बिहारला लुटले आहे. राज्याची जनता त्यांना उत्तर देईल.  जेव्हा लाखों मजूर हजारो किमी पायी चालून घरी येत होते तेव्हा नितीशकुमार आणि मोदी कोठे होते. आता मत मागायला येत आहेत. आम्ही सत्तेत नाहीत त्यामुळे लाखों मजुरांची मदत करु शकलो नाहीत. पण, क्षमतेनुसार लोकांची मदत केली.

नितीशकुमार नोकऱ्यांवर बोलताच गर्दीतून कांदा फेकला मधुबनीच्या हरखालीमध्ये नितिशकुमार सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नोकऱ्यांवर बोलायला सुरुवात केली. तेव्हाच गर्दीतून कोणीतरी त्यांच्या दिशेने कांदा फेकला. यावर नितिशकुमार नाराज झाले आणि आणखी फेका, फेकत रहा, याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हणाले. यानंतर नितिशकुमारांना सुरक्षा रक्षकांनी घेरत सुरक्षा पुरविली आणि नितिशकुमारांनी त्यांचे भाषण पूर्ण केले.  सुरक्षारक्षकांनी जेव्हा कांदा फेकणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नितिशकुमारांनीच त्यांना नको म्हणून सांगितले.  

आश्वासने विसरला नाहीत, अशी आशा करतोतुम्ही आश्वासने विसरले नाहीत अशी आशा करतो बिहारमधील विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी पूर्ण न झालेल्या अनेक आश्वासनांचा उल्लेख केला आहे. १ नोव्हेंबर रोजी लिहिलेले हे पत्र राजदने ट्वीटरवर पोस्ट केले आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव