शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:29 IST

Bihar Assembly Election 2020 : लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला.

-  एस. पी. सिन्हा 

फोर्बेस्गंज : मागील दशक हे बिहारमधील आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी होते. मात्र, २०२१ - २०३० हे दशक राज्यातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला. येथे एका प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले की, जंगल राज चालविणाऱ्यांनी एकेकाळी मतदान केंद्रांवर कब्जा करुन गरिबांचा मताधिकार हिसकावून घेतला. पण, रालोआने त्यांना मतदानाचा अधिकार परत दिला.  बिहारमधील नागरिक आता त्या लोकांना ओळखून चुकले आहेत ज्यांच एकमेव स्वप्न होते की, लोकांना घाबरवून, अफवा पसरवून, फूट पाडून सत्ता हस्तगत करणे. पण, बिहारचे लोक जाणतात की, कोण बिहारच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राजदचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा उल्लेख न करता ते म्हणाले की, लोकांनी जंगलराजच्या डबल डबल युवराजांना नाकारले आहे. गत दशकात प्रत्येक घरात वीज पोहचली. आता आगामी दशकात बिहार चमकून उठेल. गत दशकात घरोघरी गॅस कनेक्शन पोहचले.

मोदी, नितीशकुमार यांनी बिहारला लुटले : राहुल गांधी कटिहार : कोरोना, बेरोजगारीची समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात केंद्र व बिहार सरकारला अपयश आले आहे, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कटिहारमधील सभेत अशी टीका केली की, मोदी आणि नितीशकुमार यांनी बिहारला लुटले आहे. राज्याची जनता त्यांना उत्तर देईल.  जेव्हा लाखों मजूर हजारो किमी पायी चालून घरी येत होते तेव्हा नितीशकुमार आणि मोदी कोठे होते. आता मत मागायला येत आहेत. आम्ही सत्तेत नाहीत त्यामुळे लाखों मजुरांची मदत करु शकलो नाहीत. पण, क्षमतेनुसार लोकांची मदत केली.

नितीशकुमार नोकऱ्यांवर बोलताच गर्दीतून कांदा फेकला मधुबनीच्या हरखालीमध्ये नितिशकुमार सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नोकऱ्यांवर बोलायला सुरुवात केली. तेव्हाच गर्दीतून कोणीतरी त्यांच्या दिशेने कांदा फेकला. यावर नितिशकुमार नाराज झाले आणि आणखी फेका, फेकत रहा, याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हणाले. यानंतर नितिशकुमारांना सुरक्षा रक्षकांनी घेरत सुरक्षा पुरविली आणि नितिशकुमारांनी त्यांचे भाषण पूर्ण केले.  सुरक्षारक्षकांनी जेव्हा कांदा फेकणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नितिशकुमारांनीच त्यांना नको म्हणून सांगितले.  

आश्वासने विसरला नाहीत, अशी आशा करतोतुम्ही आश्वासने विसरले नाहीत अशी आशा करतो बिहारमधील विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी पूर्ण न झालेल्या अनेक आश्वासनांचा उल्लेख केला आहे. १ नोव्हेंबर रोजी लिहिलेले हे पत्र राजदने ट्वीटरवर पोस्ट केले आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव