शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

Prashant Kishor : काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवी टक्कर देणार का?, प्रशांत किशोर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 11:02 IST

Prashant Kishor on congress revival : काँग्रेसने एकजूट होऊन काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान देऊ शकते, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (congress) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, पण काँग्रेस  2024 च्या लोकसभा निवडणुकीत  (Loksabha Poll 2024) भाजपला (BJP) जोरदार टक्कर देईल, असा विश्वास निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने एकजूट होऊन काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान देऊ शकते, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते. 

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पार्टीमध्ये संरचनात्मक कमकुवतपणा आणि बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला संधी आहे. काँग्रेस एकजूट राहिल्यास भाजपला तगडे आव्हान देऊ शकते, असे प्रशांत किशोर म्हणाले. 

'भाजप आता ताकदवान बनला आहे, पण तरीही पूर्व आणि दक्षिण भारतात संघर्ष करत आहे, कारण या प्रदेशांतील सुमारे 200 जागांपैकी 50 जागाही मिळवू शकलेल्या नाहीत. यामध्ये बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे', असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. यासाठी काँग्रेसला पुन्हा जमिनीवर यावे लागेल आणि काँग्रेसला पुनर्जन्म घ्यावा लागेल. आत्मा, विचार आणि विचारधारा यांना स्थान आहे आणि राहतील पण बाकी सर्व काही नवीन पाहिजेत. तसेच, कोणत्याही पक्षाला, विशेषत: काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पर्याय बनवायचा असेल तर, 10-15 वर्षांची मजबूत दृष्टी असायला हवी. यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. 

'गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस मजबूत नाही'सर्व विरोधकांना एकत्र करू शकतील, असे कोण नेते आहेत? असा सवाल प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला. यावर प्रशांत किशोर यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, 'सर्वांना सोबत ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली, तर त्याभोवती चेहरा बांधता येईल,' असे सांगितले. तसेच, जर तुम्ही योग्य दिशेला नॅरेटिव्ह घेऊन जाता आणि आघाडीचे लोक तुमच्याकडे असतील तर विचारधारा काहीही असो, पण भाजपचा पराभव करायचा असेल तर चेहरा आपोआप तयार होईल, असेही ते म्हणाले. तसेच, गांधी घराण्याला काँग्रेसमधून काढून टाकले तर काँग्रेस मजबूत होऊ शकणार नाही. त्यामुळेच काँग्रेसने जमिनीवर येऊन मूलभूत तत्त्वे मांडण्याची वेळ आली आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसBJPभाजपा