शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तानाट्य! काँग्रेसचे ६ मंत्र्यांसह १७ आमदार कर्नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 18:40 IST

काठावर बहुमत असलेले कमलनाथ सरकार स्थिर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.

भोपाळ - काँग्रेसची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्यच रंगले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काठावर बहुमत असलेले कमलनाथ सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने काँग्रेसच्या १७ आमदारांना कर्नाटकमध्ये हलवले आहे. यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार सर्व आमदार हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील भाजपाचे एक आमदार काँग्रेसच्या आमदारांना घेऊन बंगळुरूला पोहोचले आहेत. तसेच या आमदारांना बंगळुरूबाहेरच्या कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, महेंद्र सिंह सिसोदिया, तुलसी सिलावट, प्रभुराम चौधरी आणि गोविंद सिंह राजपूत हे आमदार कर्नाटकात पोहोचल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या घडामोडींनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला आता स्वस्थ बसवत नाही आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांनी जो काही भ्रष्टाचार केला आहे, तो आता समोर येत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, असे कमलनाथ म्हणाले.

 काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या सरकारमधील आमदारांनी बंडाळी केली होती. त्यावेळी ३ मार्च रोजी काँग्रेस, बसपा आणि सपा या पक्षांचे मिळून नऊ आमदार बेपत्ता झाले होते. मात्र त्यापैकी तीन आमदारांना दुसऱ्या दिवशी परत भोपाळला आणण्यात काँग्रेसला यश आले होते. त्यानंतर अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा, काँग्रेस आमदार बिसाहू लाल सिंह आणि रघुराज कंसाना हेसुद्धा परतले होते. मात्र काँग्रेसचे अन्य एक आमदार हरदीप सिंह डंग यांना मात्र राजीनामा दिला होता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण