शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

बॉर्डरवर पोलीस वाजवतायेत 'संदेशे आते है' गाणं; शेतकरी म्हणाले, बंद करा, आम्हाला त्रास होतोय

By प्रविण मरगळे | Updated: February 2, 2021 08:01 IST

शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात दगडफेक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून तातडीने अटक करावी.

ठळक मुद्देशेतकरी आणि पत्रकार मनदीप पूनिया यांची सुटका करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांकडून सतत डीजे वाजवला जातोय, तो बंद केला जावाडीजेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

नवी दिल्ली – कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीवर गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सिंधु बॉर्डरवर ठिकठिकाणी डीजे लावण्यात आला आहे. येथे बॉर्डर सिनेमातील संदेशे आते है, अशाप्रकारे गाणी वाजवली जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी हा डिजे बंद करण्याची मागणी करत आहेत. डीजेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन जारी केले आहे.

किसान मजदूर संघर्ष समितीचे पंजाब प्रदेशाध्यक्ष सतनाम सिंह पन्नू, महासचिव सरवन सिंह पंढेर, प्रदेश उपाध्यक्ष सविंद्र सिंह चताला यांनी लिखित निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की, शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यापूर्वी अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडून देणे, बॅरिकेड्ससह पाणी, इंटरनेट आणि वॉशरुमवरील बंदी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला केली आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांकडून सतत डीजे वाजवला जातोय, तो बंद केला जावा, त्यामुळे येथील परिस्थिती सर्वसामान्य राहील असं ते म्हणाले आहेत.

किसान मजदूर संघर्ष समिती पंजाबकडून दिलेल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की, संघटनेचे कायदेशीर सल्लागार आणि दिल्लीतील वकील पोलिसांकडून दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत तपास करत आहे, पश्चिम विहार वेस्ट १२ एफआयआर, अलीपूर ३५ एफआयआर, नजफगढ ७, नांगलोई ८, शाहदरा ३ आणि उत्तमनगर ८ असे एकूण ७३ एफआयआर शेतकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, २६ जानेवारीच्या हिंसक आंदोलनानंतर ज्यांनी दंगल माजवली त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात दगडफेक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून तातडीने अटक करावी, त्याचसोबत शेतकरी आणि पत्रकार मनदीप पूनिया यांची सुटका करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी नववीर सिंह यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ४ फेब्रुवारीला श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार