शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बॉर्डरवर पोलीस वाजवतायेत 'संदेशे आते है' गाणं; शेतकरी म्हणाले, बंद करा, आम्हाला त्रास होतोय

By प्रविण मरगळे | Updated: February 2, 2021 08:01 IST

शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात दगडफेक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून तातडीने अटक करावी.

ठळक मुद्देशेतकरी आणि पत्रकार मनदीप पूनिया यांची सुटका करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांकडून सतत डीजे वाजवला जातोय, तो बंद केला जावाडीजेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

नवी दिल्ली – कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीवर गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सिंधु बॉर्डरवर ठिकठिकाणी डीजे लावण्यात आला आहे. येथे बॉर्डर सिनेमातील संदेशे आते है, अशाप्रकारे गाणी वाजवली जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी हा डिजे बंद करण्याची मागणी करत आहेत. डीजेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन जारी केले आहे.

किसान मजदूर संघर्ष समितीचे पंजाब प्रदेशाध्यक्ष सतनाम सिंह पन्नू, महासचिव सरवन सिंह पंढेर, प्रदेश उपाध्यक्ष सविंद्र सिंह चताला यांनी लिखित निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की, शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यापूर्वी अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडून देणे, बॅरिकेड्ससह पाणी, इंटरनेट आणि वॉशरुमवरील बंदी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला केली आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांकडून सतत डीजे वाजवला जातोय, तो बंद केला जावा, त्यामुळे येथील परिस्थिती सर्वसामान्य राहील असं ते म्हणाले आहेत.

किसान मजदूर संघर्ष समिती पंजाबकडून दिलेल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की, संघटनेचे कायदेशीर सल्लागार आणि दिल्लीतील वकील पोलिसांकडून दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत तपास करत आहे, पश्चिम विहार वेस्ट १२ एफआयआर, अलीपूर ३५ एफआयआर, नजफगढ ७, नांगलोई ८, शाहदरा ३ आणि उत्तमनगर ८ असे एकूण ७३ एफआयआर शेतकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, २६ जानेवारीच्या हिंसक आंदोलनानंतर ज्यांनी दंगल माजवली त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात दगडफेक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून तातडीने अटक करावी, त्याचसोबत शेतकरी आणि पत्रकार मनदीप पूनिया यांची सुटका करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी नववीर सिंह यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ४ फेब्रुवारीला श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार