शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

बॉर्डरवर पोलीस वाजवतायेत 'संदेशे आते है' गाणं; शेतकरी म्हणाले, बंद करा, आम्हाला त्रास होतोय

By प्रविण मरगळे | Updated: February 2, 2021 08:01 IST

शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात दगडफेक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून तातडीने अटक करावी.

ठळक मुद्देशेतकरी आणि पत्रकार मनदीप पूनिया यांची सुटका करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांकडून सतत डीजे वाजवला जातोय, तो बंद केला जावाडीजेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

नवी दिल्ली – कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीवर गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सिंधु बॉर्डरवर ठिकठिकाणी डीजे लावण्यात आला आहे. येथे बॉर्डर सिनेमातील संदेशे आते है, अशाप्रकारे गाणी वाजवली जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी हा डिजे बंद करण्याची मागणी करत आहेत. डीजेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन जारी केले आहे.

किसान मजदूर संघर्ष समितीचे पंजाब प्रदेशाध्यक्ष सतनाम सिंह पन्नू, महासचिव सरवन सिंह पंढेर, प्रदेश उपाध्यक्ष सविंद्र सिंह चताला यांनी लिखित निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की, शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यापूर्वी अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडून देणे, बॅरिकेड्ससह पाणी, इंटरनेट आणि वॉशरुमवरील बंदी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला केली आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांकडून सतत डीजे वाजवला जातोय, तो बंद केला जावा, त्यामुळे येथील परिस्थिती सर्वसामान्य राहील असं ते म्हणाले आहेत.

किसान मजदूर संघर्ष समिती पंजाबकडून दिलेल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की, संघटनेचे कायदेशीर सल्लागार आणि दिल्लीतील वकील पोलिसांकडून दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत तपास करत आहे, पश्चिम विहार वेस्ट १२ एफआयआर, अलीपूर ३५ एफआयआर, नजफगढ ७, नांगलोई ८, शाहदरा ३ आणि उत्तमनगर ८ असे एकूण ७३ एफआयआर शेतकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, २६ जानेवारीच्या हिंसक आंदोलनानंतर ज्यांनी दंगल माजवली त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात दगडफेक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून तातडीने अटक करावी, त्याचसोबत शेतकरी आणि पत्रकार मनदीप पूनिया यांची सुटका करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी नववीर सिंह यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ४ फेब्रुवारीला श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार