शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 10:29 AM

दर महिन्याला 150 कोटी रुपयांची वसुली करण्याचं लक्ष्य

नवी दिल्ली: नीरव मोदीनं तब्बल 13 हजार कोटी बुडवल्यानं संकटात सापडलेल्या पंजाब नॅशनल बँकेनं आता कर्जवसुलीसाठी कंबर कसली आहे. पीएनबीनं कर्ज बुडवणाऱ्यांच्या विरोधात अनोखं अभियान सुरू केलं. या अभियानांतर्गत बँकेचे कर्मचारी गांधीगिरीच्या मार्गानं कर्जवसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पीएनबीचे कर्मचारी कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या कार्यालयात फलक घेऊन बसतात. यामुळे पैसे बुडवणाऱ्यांना स्वत:ची लाज वाटेल आणि ते कर्जाची परतफेड करतील, अशी आशा पीएनबीला आहे. या माध्यमातून महिन्याकाठी 150 कोटी रुपयांच्या कर्जवसुलीचं लक्ष्य बँकेनं ठेवलं आहे. 'पीएनबी'चं मिशन गांधीगिरी अभियान एक वर्ष चालणार आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीनं 13 हजार कोटींचं कर्ज बुडवल्यानं पीएनबीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यामुळेच आता बँकेनं कर्जवसुलीसाठी गांधीगिरी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत बँक कर्मचाऱ्यांची टीम पैसे बुडवणाऱ्या व्यक्तीच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन बसते. या टीमकडून कोणतीही घोषणाबाजी केली जात नाही. सध्या या गांधीगिरी अभियानात बँकेच्या 1,144 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. कर्जदारांशी चर्चा सुरू व्हावी, त्यातून दर महिन्याला 100 ते 150 कोटी रुपयांचं कर्ज वसूल व्हावं, यासाठी गांधीगिरी अभियान सुरू केल्याची माहिती बँकेनं प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. बँकेनं हेतुपुरस्पर कर्ज बुडवणाऱ्यांची यादी तयार केली असून त्यात 1,084 लोकांच्या नावांचा समावेश आहे. यातील 220 जणांचे फोटो बँकेनं वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आहेत. कर्जाची परतफेड न करणाऱ्या 150 जणांचे पासपोर्ट गेल्या काही महिन्यांमध्ये जप्त करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा