शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स असणाऱ्यांनी व्हा अलर्ट, खात्यात ३४२ रुपये नसतील तर बसेल ४ लाखांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 7:11 PM

Banking Alert News: जर तुम्हीही नेहमी बँक अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स ठेवत असाल किंवा बॅलन्सच टेवत नसाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. ही बातमी वाचल्याने आणि त्यादिशेने पावले उचलल्याने तुमचे चार लाख रुपयांपर्यंतचे नुकसान टळू शकते.

मुंबई -  जर तुम्हीही नेहमी बँक अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स ठेवत असाल किंवा बॅलन्सच टेवत नसाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. ही बातमी वाचल्याने आणि त्यादिशेने पावले उचलल्याने तुमचे चार लाख रुपयांपर्यंतचे नुकसान टळू शकते. हो, पहिल्यांदा तुम्हाला ही बाब गंमत वाटेल मात्र ती अगदी खरी आहे. त्याचं कारण म्हणजे पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना रिन्यू करण्याची तारीख जवळ आली आहे. 

सरकारच्या या दोन्ही योजनांना वार्षिक आधारावर रिन्यू करण्यासाठी अंतिम तिथी ३१ मे आहे. जर तुमच्या खात्यामध्ये योग्य बॅलन्स नसेल आणि या दोन्ही योजना रिन्यूअल झाल्या नाहीत तर तुम्हाला चार लाख रुपयांचा विमा मिळणार नाही. त्यामुळे तुमचे चार लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. आज आपण जाणून घेऊयात या योजनांच्या अटीशर्तींबाबत.

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेमध्ये कुठल्याही कारणाने होणाऱ्या मृत्यूसाठी संरक्षण दिलं जातं. १८ ते ५० वर्षांदरम्यान तुम्ही या योजनेशी संलग्न होऊ शकता. ५० वर्षांच्या वयापूर्वी या विमा योजनेशी जोडले गेल्यास आणि प्रीमियमचा भरणा केल्यास तुमच्या जीवनाला ५५ व्या वर्षापर्यंतच कव्हर मिळेल. 

सरकारच्या या योजनेंतर्गत तुम्हाला ३३० रुपये प्रतिवर्ष भरणा केल्यावर २ लाख रुपयांचे जीवन विमा कव्हर मिळू शकेल. याची नोंदणी तुम्ही बँकेची शाखा, बीसी पॉईंट किंवा पोस्ट ऑफीसमधून करू शकता. योजनेमध्ये प्रीमियम तुमच्या अकाऊंटमधून ऑटो डेबिट होईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये कुठल्याही दुर्घटनेमुळे होणारे मृत्यू किंवा अपंगतेसाठी सुरक्षा कव्हर दिलं जातं. या योजनेमध्ये तुम्ही १८ व्या वर्षापासून ७० व्या वर्षापर्यंत जोडले जाऊ शकता. या योजनेंतर्गत दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि अंशत: अपंगत्व आल्यास १ लाख रुपये देण्याची तरतूद आहे. या योजनेचा वार्षिक प्रीमियम १२ रुपये आहे. याअंतर्गत दोघांचेही एकूण प्रीमियम एकूण २४२ रुपये एवढा होतो. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकInvestmentगुंतवणूक