शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

जवानांच्या बलिदानाचा हाच का 'मुँह तोड' जबाव? चीनकडून 5,521 कोटींचे कर्ज घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 13:43 IST

खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी लडाख सीमारेषेवरील कारवाईवर शंका उपस्थित करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारने 19 जून रोजी चीनकडून 5521 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी शेअर करत हाच का चीनला मुँह तोड जवाब असे औवेसी यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देखासदार असुदुद्दीन औवेसी यांनी लडाख सीमारेषेवरील कारवाईवर शंका उपस्थित करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारने 19 जून रोजी चीनकडून 5521 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी शेअर करत हाच का चीनला मुँह तोड जवाब असे औवेसी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. चीनवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. राजनाथ सिंह यांनी हे मान्य केले की, चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे. एकीकडे भारत सरकार चीनविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दाखवत आहे. मात्र, चीनला जशास तसे उत्तर दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून मोदी सरकारवर करण्यात येत आहे. आता, एमआयएमचे नेते व खासदार असुदुद्दीने औवेसी यांनीही मोदी सरकारला सवाल केला आहे.

खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी लडाख सीमारेषेवरील कारवाईवर शंका उपस्थित करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारने 19 जून रोजी चीनची गुंतवणूक असलेल्या बँकांकडून तब्बल 5521 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी शेअर करत हाच का चीनला मुँह तोड जवाब असे औवेसी यांनी म्हटले आहे. लडाख सीमारेषेवर तैनात चीनी सैन्य व भारतीय जवानांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामध्ये, भारताच्या 20 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. चीनला मुँह तोड जवाब देणार असे, पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. मात्र, 15 जून रोजी देशाचे 20 जवान शहीद झाल्यानंतर, केवळ 5 दिवसांतच सरकारने 5521 कोटी रुपयांचे कर्ज चीनकडून घेतले आहे. मग, हाच का तुमचा मुँह तोड जवाब असे म्हणत औवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

देशासाठी हौतात्म्य पत्कारणाऱ्या जवानांचा हा किती मोठा अपमान आहे, असेही औवेसी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. औवेसी यांनी टेलिग्राफ इंडिया या वेबसाईडच्या बातमीची लिंक शेअर करत पंतप्रधानानांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी संसदेत लडाख सीमारेषेचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

संरक्षणमंत्री संसदेत म्हणाले

भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. राजनाथ यांच्या निवेदनावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांना बोलण्याची परवानगी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे सदस्य विरोध दाखवून सभागृहातून निघून गेले. सभागृहाबाहेर अधीर रंजन यांनी आरोप केला की, सरकार विरोधकांचा आवाज ऐकत नाही कारण त्याला भीती आहे की, जे खोटे बोलले जात आहे ते उघडे पडेल. सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, ते लडाखवर चर्चा करू इच्छित नाही.

राहुल गांधींची संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

राजनाथ सिंह यांच्या भाषणानंतर लगेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘संरक्षणमंत्र्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसते की, मोदी यांनी देशाची चिनी अतिक्रमणावर दिशाभूल केली, देश लष्करासोबत उभा राहील. परंतु, मोदीजी तुम्ही कधी चीनविरुद्ध उभे राहाल? चीनकडून आमच्या देशाची जमीन केव्हा परत घेणार, चीनचे नाव घ्यायला घाबरू नका.’सरकारच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने आरोप केला की, मोदी आणि त्यांचे सरकार संसदेत व बाहेर चिनी घुसखोरीवरून खोटे बोलत आहे.

चीनी सरकारी वृत्तपत्रातून धमकी

पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी नेते एकीकडे शांततेचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून युद्धाची धमकी देण्यात आली आहे. चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन म्हणाले की, चिनी सैन्य भारतीय टँक नष्ट करण्याचा सराव करीत आहे. मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांमधील पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी भारत सरकारने केली नाही, तर चिनी सैन्य भारताला योग्य उत्तर देण्यास तयार आहे, अशी धमकी त्यांनी दिली.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीchinaचीनprime ministerपंतप्रधान