शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जवानांच्या बलिदानाचा हाच का 'मुँह तोड' जबाव? चीनकडून 5,521 कोटींचे कर्ज घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 13:43 IST

खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी लडाख सीमारेषेवरील कारवाईवर शंका उपस्थित करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारने 19 जून रोजी चीनकडून 5521 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी शेअर करत हाच का चीनला मुँह तोड जवाब असे औवेसी यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देखासदार असुदुद्दीन औवेसी यांनी लडाख सीमारेषेवरील कारवाईवर शंका उपस्थित करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारने 19 जून रोजी चीनकडून 5521 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी शेअर करत हाच का चीनला मुँह तोड जवाब असे औवेसी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. चीनवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. राजनाथ सिंह यांनी हे मान्य केले की, चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे. एकीकडे भारत सरकार चीनविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दाखवत आहे. मात्र, चीनला जशास तसे उत्तर दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून मोदी सरकारवर करण्यात येत आहे. आता, एमआयएमचे नेते व खासदार असुदुद्दीने औवेसी यांनीही मोदी सरकारला सवाल केला आहे.

खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी लडाख सीमारेषेवरील कारवाईवर शंका उपस्थित करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारने 19 जून रोजी चीनची गुंतवणूक असलेल्या बँकांकडून तब्बल 5521 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी शेअर करत हाच का चीनला मुँह तोड जवाब असे औवेसी यांनी म्हटले आहे. लडाख सीमारेषेवर तैनात चीनी सैन्य व भारतीय जवानांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामध्ये, भारताच्या 20 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. चीनला मुँह तोड जवाब देणार असे, पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. मात्र, 15 जून रोजी देशाचे 20 जवान शहीद झाल्यानंतर, केवळ 5 दिवसांतच सरकारने 5521 कोटी रुपयांचे कर्ज चीनकडून घेतले आहे. मग, हाच का तुमचा मुँह तोड जवाब असे म्हणत औवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

देशासाठी हौतात्म्य पत्कारणाऱ्या जवानांचा हा किती मोठा अपमान आहे, असेही औवेसी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. औवेसी यांनी टेलिग्राफ इंडिया या वेबसाईडच्या बातमीची लिंक शेअर करत पंतप्रधानानांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी संसदेत लडाख सीमारेषेचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

संरक्षणमंत्री संसदेत म्हणाले

भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. राजनाथ यांच्या निवेदनावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांना बोलण्याची परवानगी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे सदस्य विरोध दाखवून सभागृहातून निघून गेले. सभागृहाबाहेर अधीर रंजन यांनी आरोप केला की, सरकार विरोधकांचा आवाज ऐकत नाही कारण त्याला भीती आहे की, जे खोटे बोलले जात आहे ते उघडे पडेल. सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, ते लडाखवर चर्चा करू इच्छित नाही.

राहुल गांधींची संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

राजनाथ सिंह यांच्या भाषणानंतर लगेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘संरक्षणमंत्र्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसते की, मोदी यांनी देशाची चिनी अतिक्रमणावर दिशाभूल केली, देश लष्करासोबत उभा राहील. परंतु, मोदीजी तुम्ही कधी चीनविरुद्ध उभे राहाल? चीनकडून आमच्या देशाची जमीन केव्हा परत घेणार, चीनचे नाव घ्यायला घाबरू नका.’सरकारच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने आरोप केला की, मोदी आणि त्यांचे सरकार संसदेत व बाहेर चिनी घुसखोरीवरून खोटे बोलत आहे.

चीनी सरकारी वृत्तपत्रातून धमकी

पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी नेते एकीकडे शांततेचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून युद्धाची धमकी देण्यात आली आहे. चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन म्हणाले की, चिनी सैन्य भारतीय टँक नष्ट करण्याचा सराव करीत आहे. मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांमधील पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी भारत सरकारने केली नाही, तर चिनी सैन्य भारताला योग्य उत्तर देण्यास तयार आहे, अशी धमकी त्यांनी दिली.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीchinaचीनprime ministerपंतप्रधान