शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

"काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला", संविधानावर बोलताना नरेंद्र मोदींचा हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 20:43 IST

PM Narendra Modi On 75th Year of Constitution : जगात लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा काँग्रेसच्या या कलंकावर चर्चा होईल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

PM Narendra Modi On 75th Year of Constitution : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.१४) लोकसभेत संविधानावर आपले मत व्यक्त केले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर टीका केली. तसेच, काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

देश जेव्हा संविधानाचे २५ वर्षे पूर्ण करत होता, तेव्हा संविधान हिसकावून घेण्यात आली होते, देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. देशाचे तुरुंगात रूपांतर करण्यात आले होते. प्रेसला कुलूप लावण्यात आले होते. जगात लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा काँग्रेसच्या या कलंकावर चर्चा होईल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, काँग्रेसच्या एका घराण्याने संविधान दुखावण्याची कोणतीही कसर सोडली नाही. ५५ वर्षे एकाच परिवाराने राज्य केले, त्यामुळे देशात काय करायचे, याचा अधिकार देशाला आहे. या परिवाराने संविधानाला प्रत्येक स्तरावर आव्हान दिले आहे. जेव्हा देशाच्या संविधानाला ५० वर्षे पूर्ण होत असताना मलाही मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती. ज्यावेळी ६० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी हत्तीवरून संविधानाची गौरव यात्रा काढण्यात आली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून मुख्यमंत्र्यांना म्हटले की, संविधान आपल्या रस्त्यात आलं तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल करावा लागेल, असे म्हटले होते. तसेच काँग्रेसने वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. ६० वर्षात ७५ वेळा संविधान बदलण्यात आले, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

जी परंपरा नेहरूंनी सुरू केली आणि तीच इंदिरा गांधी यांनी पुढे नेली. १९७१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला. त्या निर्णयाला संविधान बदलले गेले. आणि १९७१ संविधान तरतूद केली गेली. त्यांनी देशाच्या न्यायालयाचे पंख कापून टाकले होते. संसद संविधानाच्या कोणत्याही कलममध्ये काहीही करू शकते आणि त्याकडे न्यायालय पाहूही शकत नाही, अशी ती तरतूद होती. न्यायालयाचे हे अधिकार काढून टाकले होते. हे पाप १९७१ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी केले होते, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

याचबरोबर, राजीव गांधींनी संविधानाला आणखी एक गंभीर धक्का दिला. त्यामुळे समानतेच्या भावनेला धक्का बसला. तसेच, भारतातील महिलांना न्याय देण्याचे काम संविधानाच्या मर्यादेच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, पण व्होट बँकेसाठी राजीव गांधींनी संविधानाच्या भावनेचा त्याग करून कट्टरपंथीयांसमोर नतमस्तक झाले होते, असे म्हणत नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू