शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

पंतप्रधानांनी द्वेष पसरवून भारताला कमजोर केले; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 06:43 IST

तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी होते. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले व मोदींना ताकद दाखवून दिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात द्वेष पसरविल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी म्हणाले की, द्वेष व संतापाच्या वातावरणाचा फायदा चीन, पाकिस्तान व भारताच्या शत्रूंना होणार आहे. काँग्रेसच्या महागाईवरील हल्लाबोल रॅलीमध्ये ते म्हणाले, आता विरोधकांकडे जनतेत जाण्याशिवाय व थेट संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही. त्यामुळेच काँग्रेस ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे.तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी होते. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले व मोदींना ताकद दाखवून दिली. देशात अशी स्थिती आहे की, इच्छा असूनही युवकांना रोजगार मिळू शकत नाहीत. मीडिया, प्रेस, न्यायपालिका, निवडणूक आयोग यावर सरकारचा दबाव आहे. त्यामुळे आमच्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा महत्त्वपूर्ण आहे. 

ईडीला घाबरणार नाही’आम्ही ईडीला घाबरणारे नाहीत. ज्याला भीती वाटते, तो द्वेष निर्माण करतो. ज्याला भीती नाही, तो द्वेष पसरवत नाही. विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांच्या मागे ईडी व सीबीआय लावली. मी ईडीला घाबरत नाही. तुम्ही ५५ तास ठेवा, १०० तास ठेवा, २०० तास ठेवा, पाच वर्षे ठेवा, मला काहीही फरक पडत नाही. आमचे संविधान देशाचा आत्मा आहे. ते वाचविण्याचे काम प्रत्येक देशवासीयाला करावे लागेल. आम्ही हे काम केले नाही तर हा देश वाचणार नाही.  - राहुल गांधी, काँग्रेस नेते

गांधी कुटुंबाची विश्वसनीयता जास्त’-  काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी रॅलीला संबोधित केले. भाजपच्या लोकांनी लोकशाहीचा मुखवटा धारण केलेला आहे. -  गांधी कुटुंबाची विश्वसनीयता पंतप्रधानांपेक्षाही जास्त आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले.-  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यावेळी म्हणाले की, महागाई आणि बेरोजगारी रोखण्यावर नव्हे, तर केंद्र सरकारचे लक्ष राहुल गांधी यांना कसे रोखले जाईल, यावर आहे. -  काँग्रेसच्या महागाईच्या विरोधातील रॅलीमध्ये प्रचंड संख्येने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी बॅनर व पोस्टरद्वारे केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा