शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी द्वेष पसरवून भारताला कमजोर केले; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 06:43 IST

तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी होते. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले व मोदींना ताकद दाखवून दिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात द्वेष पसरविल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी म्हणाले की, द्वेष व संतापाच्या वातावरणाचा फायदा चीन, पाकिस्तान व भारताच्या शत्रूंना होणार आहे. काँग्रेसच्या महागाईवरील हल्लाबोल रॅलीमध्ये ते म्हणाले, आता विरोधकांकडे जनतेत जाण्याशिवाय व थेट संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही. त्यामुळेच काँग्रेस ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे.तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी होते. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले व मोदींना ताकद दाखवून दिली. देशात अशी स्थिती आहे की, इच्छा असूनही युवकांना रोजगार मिळू शकत नाहीत. मीडिया, प्रेस, न्यायपालिका, निवडणूक आयोग यावर सरकारचा दबाव आहे. त्यामुळे आमच्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा महत्त्वपूर्ण आहे. 

ईडीला घाबरणार नाही’आम्ही ईडीला घाबरणारे नाहीत. ज्याला भीती वाटते, तो द्वेष निर्माण करतो. ज्याला भीती नाही, तो द्वेष पसरवत नाही. विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांच्या मागे ईडी व सीबीआय लावली. मी ईडीला घाबरत नाही. तुम्ही ५५ तास ठेवा, १०० तास ठेवा, २०० तास ठेवा, पाच वर्षे ठेवा, मला काहीही फरक पडत नाही. आमचे संविधान देशाचा आत्मा आहे. ते वाचविण्याचे काम प्रत्येक देशवासीयाला करावे लागेल. आम्ही हे काम केले नाही तर हा देश वाचणार नाही.  - राहुल गांधी, काँग्रेस नेते

गांधी कुटुंबाची विश्वसनीयता जास्त’-  काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी रॅलीला संबोधित केले. भाजपच्या लोकांनी लोकशाहीचा मुखवटा धारण केलेला आहे. -  गांधी कुटुंबाची विश्वसनीयता पंतप्रधानांपेक्षाही जास्त आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले.-  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यावेळी म्हणाले की, महागाई आणि बेरोजगारी रोखण्यावर नव्हे, तर केंद्र सरकारचे लक्ष राहुल गांधी यांना कसे रोखले जाईल, यावर आहे. -  काँग्रेसच्या महागाईच्या विरोधातील रॅलीमध्ये प्रचंड संख्येने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी बॅनर व पोस्टरद्वारे केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा