शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कृषी कायद्यांबद्दल काही जण संभ्रम निर्माण करताहेत; मोदींचा विरोधकांवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Published: November 30, 2020 5:42 PM

दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू; हजारो शेतकरी रस्त्यावर

वाराणसी: गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हरयाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान भाष्य केलं आहे. कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र काही जण शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.कृषी कायद्यांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. गैरसमज निर्माण केले जात आहेत. ज्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचा छळ केला, ते आता शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत, असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केलं. नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय मिळतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 'सरकारं कायदे तयार करतात. काही प्रश्न स्वाभाविक आहेत. तो लोकशाहीचा भाग आहे. पण गेल्या काही वर्षांपासून वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. आधी सरकारचा निर्णय पसंत न पडल्यास विरोध व्हायचा. पण आता अफवा, संभ्रम तयार केला जातो. भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशी भीती निर्माण केली जाते,' असं मोदींनी म्हटलं.सरकारनं केलेल्या कृषी सुधारणा ऐतिहासिक आहेत. मात्र त्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. आतापर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं, त्यांच्याकडूनच आता अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. याआधी पिकांसाठी हमीभाव असूनही खरेदी कमी व्हायची. शेतकऱ्यांच्या नावाखाली कर्जमाफी माफी व्हायची. पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची नाही, असं मोदी म्हणाले. 'नव्या कृषी कायद्यांत जुन्या पद्धतीला रोखणारी कोणतीही तरतूद नाही. आधी बाजाराबाहेर होणारा व्यवहार बेकायदेशीर होता. अशा परिस्थितीत छोट्या शेतकऱ्यांची फसवणूक व्हायची. आता लहान शेतकरीसुद्धा बाजारबाहेर झालेल्या व्यवहाराविरोधात कायदेशीर पावलं उचलू शकतो. शेतकऱ्यांना आता नवे पर्याय खुले झाले असून त्यांना फसवणुकीपासून कायद्यांचं संरक्षण मिळालं आहे,' असं मोदींनी सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी